शहरं
Join us  
Trending Stories
1
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
2
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
3
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
4
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
5
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
6
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
7
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
8
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
9
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
10
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
11
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
12
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
13
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
14
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
15
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
16
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
17
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
18
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
19
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
20
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 22:37 IST

अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

ठाणे : अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.दिवाळी आली तोंडावर... रेशन नाही दुकानावर, रेशन बचाव... अच्छे दिन लाव, अच्छे दिन आ गये... गरीबों का राशन खा गये... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणसी पाच किलो धान्य मिळते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना कितीही सदस्य असले, तरी ३५ किलो धान्य मिळत असे. परंतु, आता अंत्योदय कार्डधारकांना प्राधान्य गटातील पाच किलो धान्य मिळणार आहे. आदिवासी, गरीब, कातकरी, कोलाम किंवा विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया कुटुंबप्रमुखाचे कुटुंब आदींवर शासनाच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे. तो त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. ठाण्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.अंत्योदय रेशनकार्डधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. तरीदेखील, या कार्डधारकांना प्राधान्य गटात टाकून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानाचे संजीव साने, स्वराज इंडियाचे उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

दिवाळीत सरकार खानार तुपाशी ....गरीब राहणार उपाशीपालघर, ठाणे, रायगड , नासिक  जिल्ह्यात १३ ऑक्टोबरला सर्व तहसील कार्यलयावर गरिबांच्या अन्न अधिकारासाठी जंबो शिष्टमंडळ निदर्शने करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र शासनाने  शिधा पत्रिकेवर १+२ नावे असलेल्या  आदिवासी , कातकरी, विधवा , वृध्द,  गरीबांचे अंत्योदय योजनेचे धान्य कमी करुन दिवाळी सणातच गरीबांवर उपासमारीची वेळ आणली. या मनमाणी शासनाविरोधात श्रमजीवीचे ठाण्यासह चार जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन छेडले जाणार आहे.