शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 22:37 IST

अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

ठाणे : अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.दिवाळी आली तोंडावर... रेशन नाही दुकानावर, रेशन बचाव... अच्छे दिन लाव, अच्छे दिन आ गये... गरीबों का राशन खा गये... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणसी पाच किलो धान्य मिळते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना कितीही सदस्य असले, तरी ३५ किलो धान्य मिळत असे. परंतु, आता अंत्योदय कार्डधारकांना प्राधान्य गटातील पाच किलो धान्य मिळणार आहे. आदिवासी, गरीब, कातकरी, कोलाम किंवा विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया कुटुंबप्रमुखाचे कुटुंब आदींवर शासनाच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे. तो त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. ठाण्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.अंत्योदय रेशनकार्डधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. तरीदेखील, या कार्डधारकांना प्राधान्य गटात टाकून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानाचे संजीव साने, स्वराज इंडियाचे उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

दिवाळीत सरकार खानार तुपाशी ....गरीब राहणार उपाशीपालघर, ठाणे, रायगड , नासिक  जिल्ह्यात १३ ऑक्टोबरला सर्व तहसील कार्यलयावर गरिबांच्या अन्न अधिकारासाठी जंबो शिष्टमंडळ निदर्शने करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र शासनाने  शिधा पत्रिकेवर १+२ नावे असलेल्या  आदिवासी , कातकरी, विधवा , वृध्द,  गरीबांचे अंत्योदय योजनेचे धान्य कमी करुन दिवाळी सणातच गरीबांवर उपासमारीची वेळ आणली. या मनमाणी शासनाविरोधात श्रमजीवीचे ठाण्यासह चार जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन छेडले जाणार आहे.