शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 22:37 IST

अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

ठाणे : अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.दिवाळी आली तोंडावर... रेशन नाही दुकानावर, रेशन बचाव... अच्छे दिन लाव, अच्छे दिन आ गये... गरीबों का राशन खा गये... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणसी पाच किलो धान्य मिळते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना कितीही सदस्य असले, तरी ३५ किलो धान्य मिळत असे. परंतु, आता अंत्योदय कार्डधारकांना प्राधान्य गटातील पाच किलो धान्य मिळणार आहे. आदिवासी, गरीब, कातकरी, कोलाम किंवा विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया कुटुंबप्रमुखाचे कुटुंब आदींवर शासनाच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे. तो त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. ठाण्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.अंत्योदय रेशनकार्डधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. तरीदेखील, या कार्डधारकांना प्राधान्य गटात टाकून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानाचे संजीव साने, स्वराज इंडियाचे उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

दिवाळीत सरकार खानार तुपाशी ....गरीब राहणार उपाशीपालघर, ठाणे, रायगड , नासिक  जिल्ह्यात १३ ऑक्टोबरला सर्व तहसील कार्यलयावर गरिबांच्या अन्न अधिकारासाठी जंबो शिष्टमंडळ निदर्शने करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र शासनाने  शिधा पत्रिकेवर १+२ नावे असलेल्या  आदिवासी , कातकरी, विधवा , वृध्द,  गरीबांचे अंत्योदय योजनेचे धान्य कमी करुन दिवाळी सणातच गरीबांवर उपासमारीची वेळ आणली. या मनमाणी शासनाविरोधात श्रमजीवीचे ठाण्यासह चार जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन छेडले जाणार आहे.