शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

मतांसाठी नागरिकत्व कायद्याला विरोध- विनय सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:30 IST

अभ्युदय प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात काँग्रेसवर निशाणा

डोंबिवली : नागरिकत्व कायद्यामुळे कुणाचेही अस्तित्व धोक्यात येणार नाही. मुस्लिम बांधवांनीही घाबरू नये. मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष या कायद्याला विरोध करून देशात अराजक माजवत असल्याची टीका भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली. तसेच, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या क्रांतिकारी निर्णयाच्या समर्थनार्थ पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा भ्रम आणि वास्तव’ या विषयावर टिळकनगर शाळेच्या पटांगणामध्ये शनिवारी व्याख्यान झाले. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी या कायद्याविषयी मते मांडली. यावेळी रा.स्व. संघाचे कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विकास मोडक यांनी सहस्रबुद्धे यांचा संस्थेतर्फे सत्कार केला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे नगरसेवक, शहरातील संघ स्वयंसेवक,अभ्युदय प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. सहस्रबुद्धे म्हणाले की, ज्यांना या कायद्याबाबत राजकारण करायचे आहे, त्यांना करू द्या. हा विरोध फार काळ टिकणार नाही. हा निर्णय केवळ भाजपचा नसून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही या कायद्याची वेळोवेळी गरज व्यक्त केली होती. तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही घुसखोरी रोखण्यासाठी कडक कायदा अमलात आणावा, यासाठी पत्रव्यवहार केले होते. हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध असून त्याचा जाणकार, अभ्यासक, ज्ञानी लोकांनी अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र, विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करण्याचे सोडून केवळ मते मिळणार नाहीत, या भीतीतून विरोध चालवला असल्याचा टोला सहस्रबुद्धे यांनी लगावला.राष्टÑीय नागरिक नोंदणीसंदर्भातही (एनआरसी) निर्णय घेण्यात येऊ शकतो. पण, तो एवढ्यात नाही. हा निर्णय झाल्यानंतही कुणाला भीती वाटण्याचे कारण नाही. ज्या देशात आपण राहतो, तेथे भारतीय आहोत, याची रजिस्टर नोंदणी झाली तर त्यात गैर काय? देशाच्या सुरक्षेसाठी अशी नोंदणी झाली तर वावडे का? असा सवाल सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीला टोलासंसदेत एखादा कायदा, निर्णय बहुमताने संमत होतो, त्याचे पालन राज्यांनी न करणे ही कुठली वृत्ती, असा चिमटाही सहस्रबुद्धे यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला.मग, संसद हे देशाचे सर्वोच्च मानले जाणारे व्यासपीठ, ठिकाण हवेच कशाला? लोकसभेत मंजुरी द्यायची आणि राज्यसभेत हात आखडता घ्यायचा, हे कुठले धोरण, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांना टोला लगावला. जे संसदेत मंजूर झाले, त्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक