शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

कळवा तिसऱ्या खाडी पुलाची एक लेन खुली करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

By अजित मांडके | Updated: September 23, 2022 16:18 IST

आव्हाड यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली.

ठाणे  : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलावरील एका मार्गिकेचे काम ऑगस्ट महिनाअखेर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, सप्टेंबर महिना अर्धा झाला असून आता याचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु कळवा भागातील नागरीकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ही लेन तत्काळ सुरु करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी केली. आव्हाड यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार नवरात्रोत्सवात ही लेन खुली करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

ठाणे  आणि कळवा याला जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विविध कारणाने पुलाचे काम रखडत असल्याचे दिसून आले. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एक पत्न देऊन हा पुल लवकर वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. 

तर, दुसरीकडे ठाणो महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु  केली होती. त्यानुसार या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणो-बेलापूर रोड या एका मार्गीकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबधींत ठेकेदाराला दिले होते.

परंतु आता सप्टेंबर महिना संपत आला तरी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने अखेर शुक्रवारी आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदिप या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान कळवा भागात राहणा:या नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी एक लेन तत्काळ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ही लेन खुली केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड