शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक : चंद्रेशखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:28 IST

ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या ...

ठळक मुद्देचरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक : चंद्रेशखर टिळकस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकप्रिय वाक्याने टिळक ओळखले जातातलोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली

ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकप्रिय वाक्याने टिळक ओळखले जातात. संपूर्ण आशिया खंडात ‘मिळवायचा’ हा शब्द वापरणारे भारतीय राजकीय एकमेव नेते तसेच, पुर्ण वेळ राजकारणी असताना चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक असे मत अर्थतज्ञ, लेखक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.           ठाणे नगर वाचनमंदिरातर्फे वा. अ. रेगे सभागृहात‘असे ही लोकमान्य’ या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे सोमवारी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. दोन तासांच्यावर कार्यक्रम नसावा हा दंडक टिळकांनी घातला. टिळकांचे विविध पैलूंचे वर्णन करणाऱ्या पुस्तकांपासून व्याख्यानाची सुरूवात करण्याचा मानस चंद्रशेखर टिळक यांनी यावेळी व्यक्त केला. गोविंदराव चळवळकर यांनी त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘बाळ गंगाधर टिळक’ हे नाव का ठेवले असा त्यांना एकदा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांना कोणतेही विशेषणे लावले तरी ते अपुरे आहे असे उत्तर त्यांनी दिले. प्रभाकर पुजारी यांनी भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहीले आहे त्यात दहा प्रकरणे आहेत. त्याचे शिर्षक लक्षात घेतले तर त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लक्षात येते. जनतेने चिळकांच्या बचावासाठी एकापेक्षा अधिक वेळा पैसा उभा केला होता. परंतू त्यांनी तो स्वत:साठी कधी न घेता विश्वस्त निधी म्हणून ठेवला आणि त्याचा हिशोब ते केसरीमधून मांडत होते. पैसा फंड ही संकल्पना टिळळकांनी सुरू केली नाही तर ती पिंपरी - चिंचवडमधील एका समुहाने सुरू केली. पैसा फंडवाली मंडळी चांगल्या अर्थाने टिळकांच्या मागे हहोती. त्यावेळी टिळक त्यांना म्हणाले तुमचे काम चांगले आहे, ‘मी तुमच्या मंडळावर आलो तर ब्रिटीशांची गैरनजर तुमच्या मंडळावर पडेल, तुम्ही असे काही करु नका पण तुम्हाला हवे तेथे तुम्ही माझे नाव वापरा’. आपल्या नावामुळे पैसा मिळत असेल तर त्याचे उत्तरदायित्व टिळकांवर होते. पैसा फंडची प्रत्येक बॅलेन्सशीट प्रत्येक आठवड्याला केसरीमध्ये छापून येत यावरुन त्यांचे द्रव्यशुद्धयोगीपण दिसून येते. कामगारांचे पहिले नेते हे लो. टिळक होते. कामगारांना आठ तासांची ड्युटी याचे जनक टिळकच. टिळक म्हणायचे वाढवायचा असेल तर जेवणाची वेळ वाढवा, त्यामुळे आता जो एक तासांचा लंचब्रेक आहे त्याचे जनक टिळक आहेत. आज सहा महिने प्रेग्नन्सी लिव्ह दिली जाते त्याचे सुतोवाच टिळकांनी दिले होते. टिळकांना स्वराज्य हवे होते पण ते स्वत:साठी कधीही नाही. ‘टिळक हे वेगवेगळ््या पद्धतीने विचार करीत असे. सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडताना टिळक म्हणाले की धर्माचे अधिष्ठान राष्ट्राला हवे, धर्माचा पेहराव नको असे प्रतिपादन चंद्रशेखर टिळक यांनी शेवटी केले. यावेळी ठाणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष केदार जोशी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकMumbaiमुंबई