शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही ...

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही मदतीविना अडकून पडले होते. हे बार्ज वादळामुळे भरकटून मुंबईपासून पालघरपर्यंत गेले. अखेर नौदलाने या बार्जवरील सर्वांची सुखरूप सुटका केली. अंबरनाथमधील देवाशिष शेळके हे या बार्जवर अडकून पडले होते. सुटकेनंतर त्यांनी या थराराची कहाणी सांगताना अंगावर काटा आला; पण त्याचवेळी शेळके यांचे डोळेही पाणावले होते.

शेळके हे बॉम्बे हायमधील एका तेल विहिरीवर क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात त्यांच्यासह तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ जणांना घेऊन निघालेली बार्ज उधाणलेल्या भर समुद्रात अडकून पडली. वादळापासून बचाव करण्यासाठी या बार्जने एक नव्हे, तर तब्बल चार नांगर टाकले; मात्र वादळाचा तडाखा इतका जोरदार होता, की हे चारही नांगर तुटले आणि त्यांची बार्ज मुंबईहून थेट पालघरपर्यंत भरकटत गेले. या दरम्यान बार्जवर अन्न पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. शिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम सुरू नव्हते. ५० तासांनी पालघरजवळील वरवडे समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे बार्ज चिखलात रुतले. तिथून काही जणांनी नौदलाशी संपर्क साधला. यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरुप सुटका केली; मात्र या ५० तासात आपण साक्षात मृत्यू समोर पाहिल्याचे देवाशिष सांगतात. त्यातच त्यांच्याप्रमाणेच दुसऱ्या तेल विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी पी ३०५ ही बार्ज बुडाल्यामुळे देवाशिष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा धीर तुटला होता. अशा परिस्थितीत केवळ नौदलामुळेच आपण सुखरुप घरी आलो, असे ते म्हणाले; मात्र त्याचवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे तत्परतेने उपाययोजना केल्या जातात, त्याप्रमाणे भारतात केल्या जात नसल्याची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

------------------------------------

आमच्याकडे फक्त बिस्किटेच होती

बार्ज धोकादायक स्थितीत असताना शेळके यांनी नौदलाचे मेजर फ्रँकलिन डिमेलो यांच्याशी संपर्क साधून त्यांना बार्जचे लोकेशन पाठविले. त्यामुळे मदत लवकर मिळाली आणि आमची सुटका झाली. बार्ज पाण्यात असताना आमच्याकडे खायलाही काही नव्हते, आम्ही केवळ बिस्किटाच्या मदतीने ५० तास काढले, असे देवाशिष शेळके यांनी सांगितले.