शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही ...

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही मदतीविना अडकून पडले होते. हे बार्ज वादळामुळे भरकटून मुंबईपासून पालघरपर्यंत गेले. अखेर नौदलाने या बार्जवरील सर्वांची सुखरूप सुटका केली. अंबरनाथमधील देवाशिष शेळके हे या बार्जवर अडकून पडले होते. सुटकेनंतर त्यांनी या थराराची कहाणी सांगताना अंगावर काटा आला; पण त्याचवेळी शेळके यांचे डोळेही पाणावले होते.

शेळके हे बॉम्बे हायमधील एका तेल विहिरीवर क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात त्यांच्यासह तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ जणांना घेऊन निघालेली बार्ज उधाणलेल्या भर समुद्रात अडकून पडली. वादळापासून बचाव करण्यासाठी या बार्जने एक नव्हे, तर तब्बल चार नांगर टाकले; मात्र वादळाचा तडाखा इतका जोरदार होता, की हे चारही नांगर तुटले आणि त्यांची बार्ज मुंबईहून थेट पालघरपर्यंत भरकटत गेले. या दरम्यान बार्जवर अन्न पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. शिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम सुरू नव्हते. ५० तासांनी पालघरजवळील वरवडे समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे बार्ज चिखलात रुतले. तिथून काही जणांनी नौदलाशी संपर्क साधला. यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरुप सुटका केली; मात्र या ५० तासात आपण साक्षात मृत्यू समोर पाहिल्याचे देवाशिष सांगतात. त्यातच त्यांच्याप्रमाणेच दुसऱ्या तेल विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी पी ३०५ ही बार्ज बुडाल्यामुळे देवाशिष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा धीर तुटला होता. अशा परिस्थितीत केवळ नौदलामुळेच आपण सुखरुप घरी आलो, असे ते म्हणाले; मात्र त्याचवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे तत्परतेने उपाययोजना केल्या जातात, त्याप्रमाणे भारतात केल्या जात नसल्याची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

------------------------------------

आमच्याकडे फक्त बिस्किटेच होती

बार्ज धोकादायक स्थितीत असताना शेळके यांनी नौदलाचे मेजर फ्रँकलिन डिमेलो यांच्याशी संपर्क साधून त्यांना बार्जचे लोकेशन पाठविले. त्यामुळे मदत लवकर मिळाली आणि आमची सुटका झाली. बार्ज पाण्यात असताना आमच्याकडे खायलाही काही नव्हते, आम्ही केवळ बिस्किटाच्या मदतीने ५० तास काढले, असे देवाशिष शेळके यांनी सांगितले.