शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही ...

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही मदतीविना अडकून पडले होते. हे बार्ज वादळामुळे भरकटून मुंबईपासून पालघरपर्यंत गेले. अखेर नौदलाने या बार्जवरील सर्वांची सुखरूप सुटका केली. अंबरनाथमधील देवाशिष शेळके हे या बार्जवर अडकून पडले होते. सुटकेनंतर त्यांनी या थराराची कहाणी सांगताना अंगावर काटा आला; पण त्याचवेळी शेळके यांचे डोळेही पाणावले होते.

शेळके हे बॉम्बे हायमधील एका तेल विहिरीवर क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात त्यांच्यासह तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ जणांना घेऊन निघालेली बार्ज उधाणलेल्या भर समुद्रात अडकून पडली. वादळापासून बचाव करण्यासाठी या बार्जने एक नव्हे, तर तब्बल चार नांगर टाकले; मात्र वादळाचा तडाखा इतका जोरदार होता, की हे चारही नांगर तुटले आणि त्यांची बार्ज मुंबईहून थेट पालघरपर्यंत भरकटत गेले. या दरम्यान बार्जवर अन्न पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. शिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम सुरू नव्हते. ५० तासांनी पालघरजवळील वरवडे समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे बार्ज चिखलात रुतले. तिथून काही जणांनी नौदलाशी संपर्क साधला. यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरुप सुटका केली; मात्र या ५० तासात आपण साक्षात मृत्यू समोर पाहिल्याचे देवाशिष सांगतात. त्यातच त्यांच्याप्रमाणेच दुसऱ्या तेल विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी पी ३०५ ही बार्ज बुडाल्यामुळे देवाशिष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा धीर तुटला होता. अशा परिस्थितीत केवळ नौदलामुळेच आपण सुखरुप घरी आलो, असे ते म्हणाले; मात्र त्याचवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे तत्परतेने उपाययोजना केल्या जातात, त्याप्रमाणे भारतात केल्या जात नसल्याची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

------------------------------------

आमच्याकडे फक्त बिस्किटेच होती

बार्ज धोकादायक स्थितीत असताना शेळके यांनी नौदलाचे मेजर फ्रँकलिन डिमेलो यांच्याशी संपर्क साधून त्यांना बार्जचे लोकेशन पाठविले. त्यामुळे मदत लवकर मिळाली आणि आमची सुटका झाली. बार्ज पाण्यात असताना आमच्याकडे खायलाही काही नव्हते, आम्ही केवळ बिस्किटाच्या मदतीने ५० तास काढले, असे देवाशिष शेळके यांनी सांगितले.