शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ नौदलामुळेच आम्ही सुखरुप घरी पोहोचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही ...

अंबरनाथ : तौक्ते चक्रीवादळात बॉम्बे हायमधील तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ कर्मचाऱ्यांना घेऊन येणारे बार्ज तब्बल ५० तास कुठल्याही मदतीविना अडकून पडले होते. हे बार्ज वादळामुळे भरकटून मुंबईपासून पालघरपर्यंत गेले. अखेर नौदलाने या बार्जवरील सर्वांची सुखरूप सुटका केली. अंबरनाथमधील देवाशिष शेळके हे या बार्जवर अडकून पडले होते. सुटकेनंतर त्यांनी या थराराची कहाणी सांगताना अंगावर काटा आला; पण त्याचवेळी शेळके यांचे डोळेही पाणावले होते.

शेळके हे बॉम्बे हायमधील एका तेल विहिरीवर क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात त्यांच्यासह तेल विहिरीवर काम करणाऱ्या १३७ जणांना घेऊन निघालेली बार्ज उधाणलेल्या भर समुद्रात अडकून पडली. वादळापासून बचाव करण्यासाठी या बार्जने एक नव्हे, तर तब्बल चार नांगर टाकले; मात्र वादळाचा तडाखा इतका जोरदार होता, की हे चारही नांगर तुटले आणि त्यांची बार्ज मुंबईहून थेट पालघरपर्यंत भरकटत गेले. या दरम्यान बार्जवर अन्न पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. शिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम सुरू नव्हते. ५० तासांनी पालघरजवळील वरवडे समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे बार्ज चिखलात रुतले. तिथून काही जणांनी नौदलाशी संपर्क साधला. यानंतर तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजावरील सर्वांची सुखरुप सुटका केली; मात्र या ५० तासात आपण साक्षात मृत्यू समोर पाहिल्याचे देवाशिष सांगतात. त्यातच त्यांच्याप्रमाणेच दुसऱ्या तेल विहिरीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी पी ३०५ ही बार्ज बुडाल्यामुळे देवाशिष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा धीर तुटला होता. अशा परिस्थितीत केवळ नौदलामुळेच आपण सुखरुप घरी आलो, असे ते म्हणाले; मात्र त्याचवेळी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे तत्परतेने उपाययोजना केल्या जातात, त्याप्रमाणे भारतात केल्या जात नसल्याची खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली.

------------------------------------

आमच्याकडे फक्त बिस्किटेच होती

बार्ज धोकादायक स्थितीत असताना शेळके यांनी नौदलाचे मेजर फ्रँकलिन डिमेलो यांच्याशी संपर्क साधून त्यांना बार्जचे लोकेशन पाठविले. त्यामुळे मदत लवकर मिळाली आणि आमची सुटका झाली. बार्ज पाण्यात असताना आमच्याकडे खायलाही काही नव्हते, आम्ही केवळ बिस्किटाच्या मदतीने ५० तास काढले, असे देवाशिष शेळके यांनी सांगितले.