शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पावसाने विश्रांती घेतल्यावरच, रस्त्याची दुरुस्ती; उल्हासनगरातील खड्ड्यावर दगड मातीचा उतारा

By सदानंद नाईक | Updated: July 25, 2023 18:28 IST

उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली.

उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीचा रस्त्यातील खड्डे न भरल्याने, संततधार पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्यातील खड्ड्यावर उतारा म्हणून दगड, मातीने खड्डे भरण्यात येत असून वाहनचालकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

 उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. मात्र संततधार पावसामुळे खड्डे भरण्यास अडथळे येत असल्याने, खड्डे मोठे दगड, रेती व मातीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. पावसाने विश्रांती घेतल्यावर रस्ते दुरुस्तीला सुरवात करण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरले असतेतर, रस्त्याची दुरावस्था झाली नसती. अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षा चालक व नागरिक देत आहेत. हिराघाट कडून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी गाड्या पडून दररोज अपघात होत आहेत. तसेच वाहने नादुरुस्त होत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक देत आहेत.

 दुरावस्था झालेले रस्ते शहरातील हिराघाट रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, सुभाष टेकडी परिसरातील रस्ते, नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, व्हीनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, मोर्या नगरी रस्ता, खेमानी परिसरातील रस्ते, गायकवाड पाडा रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन क्लब रस्ता यांच्यासह सिमेंट काँक्रीट रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. महापालिका रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच एमएमआरडीए कडून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची चौकशी झाल्यास, मोठा झोल बाहेर पडणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्यातील खड्ड्याची पाहणी गेल्या आठवड्यात करून, संततधार पावसाने दगड, मातीने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर