शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

By संदीप प्रधान | Updated: August 15, 2023 08:09 IST

सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकसंख्येचा विचार केला तर एक कोटींच्या आसपास लोक येथे वास्तव्य करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शासकीय व महापालिका इस्पितळांत केवळ दोन हजार २७० खाटा उपलब्ध आहेत. 

ठाणे शहराची लोकसंख्या २८ ते ३० लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येकरिता कळव्यातील ५०० खाटांचे रुग्णालय, सध्या जमीनदोस्त झालेले व मनोरुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेले ३५० खाटांचे रुग्णालय, खासगी संस्थेला चालवायला दिलेले हाजुरी येथील २५० खाटांचे रुग्णालय, मुंब्रा कौसा येथील १०० खाटांचे रुग्णालय व ३३ आरोग्य केंद्रे अशी तुटपुंजी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे. ठाण्यात खासगी इस्पितळे, रुग्णालये अनेक आहेत. परंतु तेथील उपचार हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तेथेही रुग्णांची भलीमोठी वेटिंग लिस्ट असते. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या या घडीला किमान १८ ते २० लाख आहे. या लोकसंख्येसाठी कल्याणमधील वसंत व्हॅली येथील ५० खाटांचे प्रसूतिगृह, कल्याणमधील १२० खाटांचे रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील १२० खाटांचे शास्त्री रुग्णालय एवढीच आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आयसीयू सुरू केले होते. परंतु दोन दिवसांत ते बंद केले. या दोन्ही शहरांमध्ये निवासी इमारतीत खासगी नर्सिंग होम चालवली जातात. 

कल्याण-डोंबिवलीत मोजकीच मोठी इस्पितळे आहेत. मात्र, त्यांचा दर्जा ठाण्यातील ज्युपिटर अथवा तत्सम इस्पितळांसारखा नाही. उल्हासनगराची आजमितीस लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे. येथे २०० खाटांचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, २०० खाटांचे कामगार रुग्णालय व १५० खाटांचे प्रसूतिगृह आहे. येथे कर्जत, कसाऱ्यापासून रुग्ण उपचाराकरिता येतात. सात लाख लोकसंख्येच्या भिवंडीत ०० खाटांचे स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, ५० खाटांचे अंबाडी ग्रामीण रुग्णालय आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांची या शहरांची मिळून लोकसंख्या पाच ते सात लाख आहे. अंबरनाथमधील छाया उपजिल्हा रुग्णालय ४० खाटांचे आहे तर बदलापूरचे दुबे ग्रामीण रुग्णालय ४० खाटांचे आहे.

ठाणे जिल्ह्यातील या शहरांकडून नाशिक, गुजरातकडे वाहतूक होते. अनेक मंत्री व धनदांडगे याच भागातून प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याच्या हिताकरिता तरी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :thaneठाणे