शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

By संदीप प्रधान | Updated: August 15, 2023 08:09 IST

सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकसंख्येचा विचार केला तर एक कोटींच्या आसपास लोक येथे वास्तव्य करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शासकीय व महापालिका इस्पितळांत केवळ दोन हजार २७० खाटा उपलब्ध आहेत. 

ठाणे शहराची लोकसंख्या २८ ते ३० लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येकरिता कळव्यातील ५०० खाटांचे रुग्णालय, सध्या जमीनदोस्त झालेले व मनोरुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेले ३५० खाटांचे रुग्णालय, खासगी संस्थेला चालवायला दिलेले हाजुरी येथील २५० खाटांचे रुग्णालय, मुंब्रा कौसा येथील १०० खाटांचे रुग्णालय व ३३ आरोग्य केंद्रे अशी तुटपुंजी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे. ठाण्यात खासगी इस्पितळे, रुग्णालये अनेक आहेत. परंतु तेथील उपचार हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तेथेही रुग्णांची भलीमोठी वेटिंग लिस्ट असते. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या या घडीला किमान १८ ते २० लाख आहे. या लोकसंख्येसाठी कल्याणमधील वसंत व्हॅली येथील ५० खाटांचे प्रसूतिगृह, कल्याणमधील १२० खाटांचे रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील १२० खाटांचे शास्त्री रुग्णालय एवढीच आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आयसीयू सुरू केले होते. परंतु दोन दिवसांत ते बंद केले. या दोन्ही शहरांमध्ये निवासी इमारतीत खासगी नर्सिंग होम चालवली जातात. 

कल्याण-डोंबिवलीत मोजकीच मोठी इस्पितळे आहेत. मात्र, त्यांचा दर्जा ठाण्यातील ज्युपिटर अथवा तत्सम इस्पितळांसारखा नाही. उल्हासनगराची आजमितीस लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे. येथे २०० खाटांचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, २०० खाटांचे कामगार रुग्णालय व १५० खाटांचे प्रसूतिगृह आहे. येथे कर्जत, कसाऱ्यापासून रुग्ण उपचाराकरिता येतात. सात लाख लोकसंख्येच्या भिवंडीत ०० खाटांचे स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, ५० खाटांचे अंबाडी ग्रामीण रुग्णालय आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांची या शहरांची मिळून लोकसंख्या पाच ते सात लाख आहे. अंबरनाथमधील छाया उपजिल्हा रुग्णालय ४० खाटांचे आहे तर बदलापूरचे दुबे ग्रामीण रुग्णालय ४० खाटांचे आहे.

ठाणे जिल्ह्यातील या शहरांकडून नाशिक, गुजरातकडे वाहतूक होते. अनेक मंत्री व धनदांडगे याच भागातून प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याच्या हिताकरिता तरी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :thaneठाणे