शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

एक कोटी लोकांसाठी अवघ्या २ हजार २७० खाटा

By संदीप प्रधान | Updated: August 15, 2023 08:09 IST

सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले.

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वसामान्य, गोरगरीब माणसाच्या जीवाला काही मोल नाही, हे पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या कळवा इस्पितळातील मृत्यूकांडाने अधोरेखित केले. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकसंख्येचा विचार केला तर एक कोटींच्या आसपास लोक येथे वास्तव्य करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शासकीय व महापालिका इस्पितळांत केवळ दोन हजार २७० खाटा उपलब्ध आहेत. 

ठाणे शहराची लोकसंख्या २८ ते ३० लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येकरिता कळव्यातील ५०० खाटांचे रुग्णालय, सध्या जमीनदोस्त झालेले व मनोरुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेले ३५० खाटांचे रुग्णालय, खासगी संस्थेला चालवायला दिलेले हाजुरी येथील २५० खाटांचे रुग्णालय, मुंब्रा कौसा येथील १०० खाटांचे रुग्णालय व ३३ आरोग्य केंद्रे अशी तुटपुंजी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे. ठाण्यात खासगी इस्पितळे, रुग्णालये अनेक आहेत. परंतु तेथील उपचार हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तेथेही रुग्णांची भलीमोठी वेटिंग लिस्ट असते. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या या घडीला किमान १८ ते २० लाख आहे. या लोकसंख्येसाठी कल्याणमधील वसंत व्हॅली येथील ५० खाटांचे प्रसूतिगृह, कल्याणमधील १२० खाटांचे रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील १२० खाटांचे शास्त्री रुग्णालय एवढीच आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आयसीयू सुरू केले होते. परंतु दोन दिवसांत ते बंद केले. या दोन्ही शहरांमध्ये निवासी इमारतीत खासगी नर्सिंग होम चालवली जातात. 

कल्याण-डोंबिवलीत मोजकीच मोठी इस्पितळे आहेत. मात्र, त्यांचा दर्जा ठाण्यातील ज्युपिटर अथवा तत्सम इस्पितळांसारखा नाही. उल्हासनगराची आजमितीस लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे. येथे २०० खाटांचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, २०० खाटांचे कामगार रुग्णालय व १५० खाटांचे प्रसूतिगृह आहे. येथे कर्जत, कसाऱ्यापासून रुग्ण उपचाराकरिता येतात. सात लाख लोकसंख्येच्या भिवंडीत ०० खाटांचे स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, ५० खाटांचे अंबाडी ग्रामीण रुग्णालय आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांची या शहरांची मिळून लोकसंख्या पाच ते सात लाख आहे. अंबरनाथमधील छाया उपजिल्हा रुग्णालय ४० खाटांचे आहे तर बदलापूरचे दुबे ग्रामीण रुग्णालय ४० खाटांचे आहे.

ठाणे जिल्ह्यातील या शहरांकडून नाशिक, गुजरातकडे वाहतूक होते. अनेक मंत्री व धनदांडगे याच भागातून प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याच्या हिताकरिता तरी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :thaneठाणे