शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

खड्ड्यांच्या केवळ १४० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:28 IST

रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे.

सुरेश लोखंडेठाणे : रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे. याचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी खड्डे दिसताच त्यांची तक्रार ठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे करण्याची व्यवस्था आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या या व्यवस्थेकडे जिल्ह्यातील केवळ १४० जणांनी वर्षभरात खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जनतेच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केले आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयास बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. चांगल्या रस्त्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून संबंधित प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित होते. पण, रस्त्यांतील खड्ड्यांच्या तक्रारी करणाऱ्यांसाठी नागरिकांचा निरुत्साह असल्याचे वर्षभरातील पाहणीतून उघड झाले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही प्रशासनाच्या निष्काळजी व अर्थपूर्ण कामकाजामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत.नागरिकांत निरुत्साहठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे नागरिकांनी चांगल्या रस्त्यांसाठी तक्रारी करून उत्तम दर्जाचे रस्ते तयार करून घेणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ यांच्याकडे रीतसर तक्रार करण्याचा हक्क न्यायालयीन निर्णयामुळे मिळाला आहे.ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर दोन नगरपालिकांमधील रस्त्यांचे खड्डे, दुरवस्थेच्या तक्रारी नागरिकांना करता येतील. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाठपुरावा करून प्रशासनाला धारेवर धरता येणार आहे. पण, नागरिकांचाही निरुत्साह आढळल्याने खड्डे वाढल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणे