शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खड्ड्यांच्या केवळ १४० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:28 IST

रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे.

सुरेश लोखंडेठाणे : रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे. याचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी खड्डे दिसताच त्यांची तक्रार ठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे करण्याची व्यवस्था आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या या व्यवस्थेकडे जिल्ह्यातील केवळ १४० जणांनी वर्षभरात खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जनतेच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केले आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयास बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. चांगल्या रस्त्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून संबंधित प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित होते. पण, रस्त्यांतील खड्ड्यांच्या तक्रारी करणाऱ्यांसाठी नागरिकांचा निरुत्साह असल्याचे वर्षभरातील पाहणीतून उघड झाले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही प्रशासनाच्या निष्काळजी व अर्थपूर्ण कामकाजामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत.नागरिकांत निरुत्साहठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे नागरिकांनी चांगल्या रस्त्यांसाठी तक्रारी करून उत्तम दर्जाचे रस्ते तयार करून घेणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ यांच्याकडे रीतसर तक्रार करण्याचा हक्क न्यायालयीन निर्णयामुळे मिळाला आहे.ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर दोन नगरपालिकांमधील रस्त्यांचे खड्डे, दुरवस्थेच्या तक्रारी नागरिकांना करता येतील. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाठपुरावा करून प्रशासनाला धारेवर धरता येणार आहे. पण, नागरिकांचाही निरुत्साह आढळल्याने खड्डे वाढल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणे