शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

आठवड्यातून एकच टँकर; काशिमीरा येथील आदिवासीपाड्यातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:54 IST

भाईंदर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

- धीरज परब मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत एकीकडे उत्तुंग इमारतींचे जाळे उभे राहत असताना दुसरीकडे काशिमीरा भागातील आदिवासीपाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पुरेसे पाणीही महापालिकेत देऊ शकत नाही. आठवड्यातून केवळ एकच टँकर देऊन आपली जबाबदारी झटकणाºया महापालिकेमुळे आदिवासींच्या घशांना कोरड पडली आहे. कोरड्या विहिरी आणि बंद पडलेल्या बोअरिंगमुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पालिकेने या आदिवासींना निदान दोन दिवसाआड जरी टँकर दिले, तरी त्यांना दिलासा मिळेल.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांना २४ तास पाणी देण्यासह पाणीयोजनांची आश्वासने राजकारण्यांकडून देण्यात आली. अनेक वर्षांपासून पाणी हा शहरातील राजकारणाचा मुख्य मुद्दा राहिलेला आहे. शहराला आज एमआयडीसीकडून सुमारे ९०, तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष पाणी मिळते. अपुरे असले तरी पाणी निदान एकदोन दिवसांआड पालिका ते देत आहे.परंतु, काशिमीरा भागातील माशाचापाडा, म्हस्करपाडा, वरठापाडा, पागेरापाडा, सावरेपाडा हे जवळपास असलेले आदिवासीपाडे मात्र पाण्यावाचून तहानलेलेच आहेत. म्हस्करपाडा भागात सुमारे १५ आदिवासींची घरे आहेत. येथे पालिकेने आजही जलवाहिनी टाकलेली नाही.पाण्याची टाकी पालिकेने बसवली असली, तरी पाणी मात्र आठवड्यातून एकदाच पालिका देते. आठवड्यातून एक टँकर पालिकेचा येतो. एका टँकरच्या पाण्यावर आठवडा कसा चालवायचा, असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. आता तर पालिकेने बसवलेली पाण्याची टाकीही दोन दिवसांपूर्वी फुटून गळू लागली आहे.वरठापाड्यात १० घरे आदिवासींची आहेत. येथेही पालिका आठवड्याने एक टँकर देते. येथे असलेले बोअरिंगही बंद आहे. मांडवीपाड्यातील २५ आदिवासी घरांनाही नळजोडणी नसून त्यांच्यासाठी आठवड्यानेच पाण्याचा टँकर दिला जातो. येथील सावरेपाडा, पागेरापाडा या आदिवासीपाड्यांची स्थितीसुद्धा वेगळी नाही. सावरेपाड्यातील बोअरिंगला पाणीच नाही, तर पागेरापाड्यातील बोअरिंगला अशुद्ध पाणी येत असल्याचे आदिवासी सांगतात.माशाचापाडा भागात आदिवासींची सुमारे वीसेक घरे आहेत. यातील काही घरे वनविभागाच्या हद्दीत असली तरी पूर्वापार आदिवासीबांधव येथे राहत आहेत. वनविभागाची हद्द असल्याने कायद्याप्रमाणे त्यांना वीजपुरवठा होत नाही. वीजमीटर लागावे म्हणून एकाला पैसे देऊन झाले. पण, अजून त्याने वीज मिळवून दिली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत. या ठिकाणी पाण्यासाठी एक विहीर आहे. पण, विहीर पार कोरडी पडली आहे. पालिकेने मारून दिलेल्या बोअरिंगला पाणीच येत नाही. याठिकाणी पालिकेने टाकी बसवली आहे. पण, टँकर मात्र आठ दिवसांनी दिला जातो.पालिका जलवाहिनी टाकण्याचा खर्च बिल्डर आणि व्होट बँक असणाºया भागांसाठी करते. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली दोन ते चार दिवसच नव्हे, तर महिनाही पालिकेने फुकट पाण्याचे टँकर पुरवले आहेत. पण जे शहराचे भूमिपुत्र आहेत, त्या आदिवासींना नळजोडण्या देणे अजून शक्य झालेले नाही. टाकीतील पाणी संपले की, पाण्यासाठी आदिवासी महिला व मुलींची भटकंती सुरू होते. आठवड्याने दिला जाणारा टँकर निदान दोन दिवसांआड मिळाला तरी घशाला पडणारी कोरड थांबेल, अशी भावना काही आदिवासींनी व्यक्त केली.माशाचापाडा आदी भागांतील आदिवासींना नळजोडण्या देण्याचा प्रयत्न आपण १९९७ पासून करतोय. पण, येथील पाटील नावाच्या खाजगी जमीनमालकाचा त्यांच्या जागेतून जलवाहिनी टाकू देण्यास विरोध आहे. प्रशासनही त्यांच्यासमोर नतमस्तक होते.- ज्योत्स्ना हसनाळे, नगरसेविकापालिकेने मारून दिलेल्या बहुतांश बोअरिंग बंद पडल्या आहेत. विहिरीला पाणी नाही. ज्या दोनेक बोअरिंग सुरू आहेत, त्यांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येते. पुढचे दोन महिने तर आणखी बिकट जातील. इतकी मोठी महापालिका झाली. पण, आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही.- हरी पागेरा, स्थानिक नागरिकविहिरीला पाणी नाही. बोअरिंगला पाणी नाही. पालिकेने टाकी बसवली आहे, पण आठ दिवसांनी टँकर येतो. पाणी पुरणार तरी कसे? पाण्याची काटकसर किती करणार? पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाण्यासाठी नागरिकांकडे भीक मागावी लागते. साहेब लोक काय बाटलीबंद पाण्याने अंघोळ करतील. पण, आम्ही घशाची कोरड कशी भागवायची. - आशा बरफ, आदिवासी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई