शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

एक वही एक पेन : घरगुती गणेशोत्सवात ज्ञानाची पेटी, आदीवासी विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक मदत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 5, 2019 15:58 IST

यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील २० कुटुंबियांनी या उपक्रमात भाग घेतला आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे: यंदा घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवून शैक्षणिक साहित्य गोळा करुन ते साहित्य दुर्गम भागातील आदीवासी विद्यार्थ्यांना देण्याचा संकल्प ठाण्यातील २० कुटुंबियांनी केला आहे. गणपतीला हार, फुले, मिठाईपेक्षा वह्या, पेन, पेन्सिल देण्याचे आवाहन त्यांनी केले असून गणेशभक्तांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.                यावर्षी गणेशोत्सवात इकोफ्रेण्डली आणि समाजप्रबोधन याची सांगड घातली गेली आहे. घरगुती गणेशोत्सवातही सामाजिक भान जपले जात आहे. विकास धनवडे यांच्या संकल्पनेतून यंदा दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ही संकल्पना राबविली आहे. त्यांच्यासह २० घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे कुटुंब जोडले गेले आहेत. या २० कुटुंबियांनी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना वह्या, पेन, पेन्सील आणण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एक वेगळाच पायंडा यंदाच्या गणेशोत्सवात घातला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनवडे यांच्या घरी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात साडे तीन डझन वह्या आणि ५० पेन ज्ञानाच्या पेटीत दिले. संदीप गोळे, नितीन सुतार, नैना मळार यांसारखे अनेक जणांनी या ज्ञानाच्या पेटीची संकल्पना आपाल्या घरगुती गणेशोत्सवात राबविली आहे. ठाम्यापासून १५० किमी अंतरावर आणि जव्हार पासून ४० किमी अंतरावर वसलेले बेहेरपाडा या आदीवासी गावातील विद्यार्थ्यांना ही मदत पोहोचविली जाणार आहे. ११०० लोकांची ही वस्ती असून या गावात २०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत या विद्यार्थ्यांना पोहोचविली जाणार असल्याचे या कुटुंबियांनी सांगितले. बेहेरपाडा हा अतिशय दुर्गम भाग असून येथील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. त्या शाळेतून त्यांना पुस्तके मिळतात पण वह्या, पेन , पेन्सील, दप्तरे मात्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही सर्वांनी मिळून केला असे धनवडे यांनी सांगितले. ही मदत झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोहोचविली जाणार आहे. झेप प्रतिष्ठानने या आधी देखील तेथील गर्भवती महिला, विद्यार्थ्यांना मदत दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. तेथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ती समस्या प्राधान्याने सोडविली जाणार आहे, त्यांसाठी एका खाजगी मोबाईल कंपनीशी चर्चा सुरू आहे. तसेच, रोजगाराचा प्रश्नही युद्धपातळीवर सोडविण्याचा झेप प्रतिष्ठानचा मानस असल्याचे धनवडे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Maharashtraमहाराष्ट्र