शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल संपेनात दोन दिवसाला एक लीटर बाटली, पाण्याची वाणवा, खाण्याचे आबाळ, क्षमतेपेक्षा जास्तीचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:10 IST

ठाण्यात महापालिकेने क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल अद्यापही संपले नसल्याचेच दिसत आहे. एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दिवस पुरवून घ्यावी लागत आहे. खाण्या, बरोबर इतरही सुविधा मिळत नसल्याने येथील नागरीक हैराण झाले आहेत.

ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरन्टाइन केले जात आहे. परंतु आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक क्वॉरन्टाइन करण्यात आले असल्याचा धक्कादायक आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी पाण्याचे बाटले भरुन ठेवले गेले आहेत, परंतु त्यामुळे एकामुळे दुसºया लागण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दोन दिवस करुन पुरवावी लागत आहे. खाण्याचे आबाळ सुरु असून, तपासणी देखील वेळेवर होतांना दिसत नसल्याची गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.                    ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला आळा घालण्यात आला पालिका प्रशासन आणि सिव्हील रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहरात आजच्या घडीला २३० वरुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे त्यांना क्वॉरन्टाइंन केले जात आहे. त्यामुळे येथील संशयीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरुपाची पुर्तता वेळचे वेळी होतांना दिसत नाही. नागरीकांचे हाल आता सुरु झाले आहेत. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असतांना एका नागरीकाला दोन दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरविली जात आहे. त्यामुळे पाण्याविना संशयीतांचे हाल सुरु झाले आहेत. शिवाय काही ठिकाणी पाच पाच लीटरचे बाटले ठेवण्यात आले असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. जेवण वेळेवर मिळत नाही. तेही आम्ही मान्य करु परंतु एखाद्याला जास्तीचा त्रास सुरु झाला तरी देखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयींताना देखील उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे माहिती येथील क्वॉरन्टाइन झालेल्या संशयीतांनी व्यक्त केली आहे. तपासणी वेळवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरीक इतरांच्याही संपर्कात येऊन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ही एकप्रकारे भरच पडत आहे.दरम्यान दुसरकीडे क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक येथे ठेवण्यात आल्याचा आरोप राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सोई सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात जगदाळे यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला असून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील शासनाला व्हिडीओद्वारे विनंती केली असून शक्यतोवर शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करावेत अशी मागणी केली आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्याचे बील हे दिड ते दोन लाख जात आहे. हे बील भरणेही लॉकडाऊमुळे शक्य होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमाईचे साधन नसल्याने एखाद्या रुग्णाने एवढे महागडे बील कसे भरायचे, असा सवाल त्यांनी केला असून आता ही एकप्रकारची लुट असून यातही भष्टÑाचार सुरु झाला की काय अशी शक्यताही निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे शासनाने याची वेळेत दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोनावर उपचार घेणाºया रुग्णांबरोबर संशयीतांचेही हाल होतांना दिसत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या