शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

शंभर भूखंड अतिक्रमणमुक्त; प्रांत अधिकाऱ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:42 IST

उल्हासनगरमध्ये भूमाफियांमध्ये उडाली खळबळ

उल्हासनगर : शहरातील खुल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रांत अधिकारी जगजितसिंग गिरासे यांनी एका वर्षात १०० पेक्षा भूखंड सरकारच्या ताब्यात आणले आहेत. सरकारी भावानुसार या भूखंडांची किमत २०० कोटीपेक्षा अधिक असली तरी बाजारभावानुसार या भूखंडांची किमत ५०० कोटीच्या वरती असल्याचे सांगण्यात आले. प्रांत अधिकाºयांच्या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. कॅम्प नंबर तीन धर्मवाडी परिसरातील अशाच एका फलकावर काळे फासून संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी केल्याची माहिती गिरासे यांनी दिली.उल्हासनगरमध्ये जागेच्या मालकी हक्काबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागेच्या मालकी हक्काअभावी विकास ठप्प पडल्याचा आरोप सत्ताधाºयांबरोबरच विरोधकांनीही केला होता. महापौर पंचम कलानी यांनी सरकारकडे काही भूखंडाच्या मालकी हक्काबाबत मागणी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी आयडीआय कंपनीजवळील आरक्षित भूखंडासह बोटक्लब, इंदिरा गांधी भाजीमार्केट व व्हीटीसी ग्राऊंड अशा चार भूखंडाची मालकी हक्क महापालिकेला हस्तांतरीत केली. ओटी सेक्शन धर्मवाडी परिसरातील जागेवर एका संस्थेने नामफलक लावला होता. प्रांत अधिकारी कार्यालयाने जागेबाबत संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी करून बोर्डाला काळे फासले आहे.महापालिकेच्या ७० ते ७५ टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असून भूखंडाच्या मालकी हक्काच्या वादामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता आली नाही. शहरात बनावट सनदेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारने सनद देणे बंद केले. शहरातील खुल्या व मोकळे भूखंड सरकारकडे जमा करण्याचा विडा प्रांत कार्यालयाने उचलला आहे. एका वर्षात कोट्यवधी किंमतीच्या १०० पेक्षा जास्त खुल्या जागा व भूखंडावर राज्य सरकारचे नामफलक लाऊन जागा सरकार दरबारी जमा केल्याची माहिती गिरासे यांनी दिली. भविष्यात ही जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असून शहर विकासाला हातभार लागणार आहे, असे गिरासे यांनी यावेळी सांगितले. पालिकेला येथील अतिक्रमण तातडीने पालिकेला हटवावी लागणार आहेत. किमान हे भूखंड मोकळा श्वास घेतील अशी प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.सनदेचा तिढा सुटता सुटेनाशहरातील खुल्या जागेवर १९६० पूर्वी कोणी ताबा दाखविला असल्यास त्या जागेला कागदपत्राच्या आधारे राज्य सरकार सनद म्हणजे मालकी हक्क देते. मात्र बोगस सनदेचा सुळसुळाट झाल्यावर सरकारने सनद देणे बंद केले. तरीही अनेक जागेची सनद भूमाफियांनी यापूर्वीच काढल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणulhasnagarउल्हासनगर