शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भिवंडीत खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 18:32 IST

मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर

भिवंडी: भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून या मध्ये ठेकेदार ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी कडून भुयारी गटर व ठिकठिकाणी उदच्चन केंद्र बनविली जात आहेत . मात्र हे काम करतांना ठेकेदारांसह मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना राबविल्या नसल्याचे वारंवार समोर आले असतांना शुक्रवारी दुपारी शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजी वाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून तेथे सुमारे तिस फूट खड्डा खोदण्यात आला आहे .कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय ३) व रेहान इम्रान शेख (वय ५) ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली . नजीकच्या इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढून शहरातील स्व इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या ३ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले .तर रेहान इम्रान शेख हा ५ वर्षांचा चिमुरडा हा या दुर्घटनेत वाचला असून त्यावर उपचार सुरू आहेत .या दुर्घटने नंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून  शांतीनगर पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात दाखल होत येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे .

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याने कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल कराव अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे .