शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

भिवंडीत खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 18:32 IST

मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर

भिवंडी: भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून या मध्ये ठेकेदार ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी कडून भुयारी गटर व ठिकठिकाणी उदच्चन केंद्र बनविली जात आहेत . मात्र हे काम करतांना ठेकेदारांसह मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना राबविल्या नसल्याचे वारंवार समोर आले असतांना शुक्रवारी दुपारी शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजी वाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून तेथे सुमारे तिस फूट खड्डा खोदण्यात आला आहे .कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय ३) व रेहान इम्रान शेख (वय ५) ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली . नजीकच्या इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढून शहरातील स्व इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या ३ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले .तर रेहान इम्रान शेख हा ५ वर्षांचा चिमुरडा हा या दुर्घटनेत वाचला असून त्यावर उपचार सुरू आहेत .या दुर्घटने नंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून  शांतीनगर पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात दाखल होत येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे .

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याने कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल कराव अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे .