शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

जिल्ह्यात निवडणूक काळात एक कोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:02 IST

आयटीच्या जाळ्यात सहा तक्रारी : आचारसंहिता भंगाचे २५ गुन्हे नोंद, शासकीय यंत्रणा सक्रिय

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शिगेला पोहोचला. शनिवारी संध्याकाळी या प्रचारास पूर्णविराम मिळणार आहे. तत्पूर्वी गुरुवारपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे २५ गुन्हे नोंद झाले आहेत. तर, जिल्हाभरात भरारी पथकांनी आतापर्यंत एक कोटी पाच लाख रुपये जप्त केले आहेत. यातील सहा तक्रारी आयकर विभागाच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था या टिकवून ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यातील १०१ ठिकाणच्या नाकाबंदीसह ७७ भरारी पथके, पोलीस यंत्रणा जिल्ह्यातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. यादरम्यान आतापर्यंत आचारसंहितेचे २५ गुन्हे नोंद ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. आर्थिक भरारी पथकांसह मतदारसंघातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असलेले सांख्यिकी निरीक्षक आदींनी एक कोटी पाच लाख ३८ हजार ४९० रुपये जप्तीची कारवाई केली आहे. यामुळे या निवडणूक कालावधीत मोठी रक्कम अन्यत्र नेआण करताना त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे, कागदपत्रे बाळगण्याच्या जबाबदारीची जाणीव होण्यास मदत झाली आहे.

मतदारसंघातून रक्कम नेत असल्याचे आढळून आल्यास भरारी पथकाच्या प्रमुखास ती माहिती तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देणे बंधनकारक आहे. याशिवाय, त्यांनी १० लाख व त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास संबंधित तक्रार आयकर विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. यानुसार, तब्बल सहा तक्रारींचा समावेश दिसून येत आहे. यामध्ये भिवंडी पूर्वच्या दोन घटनांमधील ३० लाख रुपये, शहापूरच्या दोन घटनांमधील २८ लाख, तर ऐरोलीच्या एका घटनेतील ११ लाख ७७ हजार ७४० रुपये आणि कल्याण पश्चिममध्ये जप्त केलेले १२ लाख ४८ हजार रुपये आदी सुमारे सहा घटना आयकर विभागाच्या तपासणीच्या रडारवर दिसून येत आहेत. उर्वरित मात्र १० लाख रुपयांपेक्षा कमी जप्त केलेली रक्कम यासंबंधित तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पातळीवर संबंधित अधिकाºयांनी रकमेसंबंधीचे पुरावे, कागदपत्रे, बँकेचे पासबुक आदी पुरावे खात्रीने तपासून प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार आहेत.या प्रकरणांचा स्थानिक पातळीवर होणार निपटाराजिल्ह्यातील भिवंडी पूर्वच्या घटनेतील दोन लाख १० हजार, मुंब्रा-कळव्यातील दोन घटनांमध्ये ११ लाख १० हजार, अंबरनाथच्या दोन घटनांमधील एक लाख ९२ हजार ५०० रुपये, भिवंडी पश्चिममधील दोन लाख ७४ हजार १४० आदी प्रकरणे जवळजवळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या पातळीवर निकाली निघणारी आहेत. या रकमांचे दावेदार असलेल्या व्यक्तींनी रकमेचा सुयोग्य पुरावा, कारणे पुराव्यानिशी देणे आवश्यक आहे. पण, तसे न झाल्यास जिल्हा कमिटीकडे प्रकरण येऊन त्याची पुन्हा शहानिशा केली जाते.अशी होते जप्त रकमेची कार्यवाहीजप्त केलेल्या रकमेसंबंधीच्या दावेदारांना तीन वेळा रीतसर नोटीस देऊन पुरावे सादर करण्याची संधी दिली जाते. पण, भीतीदाखल पुढील डोकेदुखी टाळण्यासाठी रकमेचे दावेदार पुढे न आल्यास जप्त रक्कम सरकारजमा होते. म्हणजेच, ती कोषागार विभागाकडे जमा करण्याची पद्धत आहे. मात्र, या पातळीपर्यंतच्या केसेस फारशा आढळून येत नाहीत. याशिवाय, जप्त केलेल्या रकमेबाबत कोणताही राजकीय हेतू दिसून येत नसेल, तर संबंधित समित्यांनी त्यांच्या पातळीवर प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार आयोगाने आधीच दिलेले असल्याचे वरिष्ठ अधिकाºयाने याविषयी स्पष्ट केले.