शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निवडणूक काळात एक कोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:02 IST

आयटीच्या जाळ्यात सहा तक्रारी : आचारसंहिता भंगाचे २५ गुन्हे नोंद, शासकीय यंत्रणा सक्रिय

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शिगेला पोहोचला. शनिवारी संध्याकाळी या प्रचारास पूर्णविराम मिळणार आहे. तत्पूर्वी गुरुवारपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे २५ गुन्हे नोंद झाले आहेत. तर, जिल्हाभरात भरारी पथकांनी आतापर्यंत एक कोटी पाच लाख रुपये जप्त केले आहेत. यातील सहा तक्रारी आयकर विभागाच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था या टिकवून ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यातील १०१ ठिकाणच्या नाकाबंदीसह ७७ भरारी पथके, पोलीस यंत्रणा जिल्ह्यातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. यादरम्यान आतापर्यंत आचारसंहितेचे २५ गुन्हे नोंद ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. आर्थिक भरारी पथकांसह मतदारसंघातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असलेले सांख्यिकी निरीक्षक आदींनी एक कोटी पाच लाख ३८ हजार ४९० रुपये जप्तीची कारवाई केली आहे. यामुळे या निवडणूक कालावधीत मोठी रक्कम अन्यत्र नेआण करताना त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे, कागदपत्रे बाळगण्याच्या जबाबदारीची जाणीव होण्यास मदत झाली आहे.

मतदारसंघातून रक्कम नेत असल्याचे आढळून आल्यास भरारी पथकाच्या प्रमुखास ती माहिती तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देणे बंधनकारक आहे. याशिवाय, त्यांनी १० लाख व त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास संबंधित तक्रार आयकर विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. यानुसार, तब्बल सहा तक्रारींचा समावेश दिसून येत आहे. यामध्ये भिवंडी पूर्वच्या दोन घटनांमधील ३० लाख रुपये, शहापूरच्या दोन घटनांमधील २८ लाख, तर ऐरोलीच्या एका घटनेतील ११ लाख ७७ हजार ७४० रुपये आणि कल्याण पश्चिममध्ये जप्त केलेले १२ लाख ४८ हजार रुपये आदी सुमारे सहा घटना आयकर विभागाच्या तपासणीच्या रडारवर दिसून येत आहेत. उर्वरित मात्र १० लाख रुपयांपेक्षा कमी जप्त केलेली रक्कम यासंबंधित तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पातळीवर संबंधित अधिकाºयांनी रकमेसंबंधीचे पुरावे, कागदपत्रे, बँकेचे पासबुक आदी पुरावे खात्रीने तपासून प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार आहेत.या प्रकरणांचा स्थानिक पातळीवर होणार निपटाराजिल्ह्यातील भिवंडी पूर्वच्या घटनेतील दोन लाख १० हजार, मुंब्रा-कळव्यातील दोन घटनांमध्ये ११ लाख १० हजार, अंबरनाथच्या दोन घटनांमधील एक लाख ९२ हजार ५०० रुपये, भिवंडी पश्चिममधील दोन लाख ७४ हजार १४० आदी प्रकरणे जवळजवळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या पातळीवर निकाली निघणारी आहेत. या रकमांचे दावेदार असलेल्या व्यक्तींनी रकमेचा सुयोग्य पुरावा, कारणे पुराव्यानिशी देणे आवश्यक आहे. पण, तसे न झाल्यास जिल्हा कमिटीकडे प्रकरण येऊन त्याची पुन्हा शहानिशा केली जाते.अशी होते जप्त रकमेची कार्यवाहीजप्त केलेल्या रकमेसंबंधीच्या दावेदारांना तीन वेळा रीतसर नोटीस देऊन पुरावे सादर करण्याची संधी दिली जाते. पण, भीतीदाखल पुढील डोकेदुखी टाळण्यासाठी रकमेचे दावेदार पुढे न आल्यास जप्त रक्कम सरकारजमा होते. म्हणजेच, ती कोषागार विभागाकडे जमा करण्याची पद्धत आहे. मात्र, या पातळीपर्यंतच्या केसेस फारशा आढळून येत नाहीत. याशिवाय, जप्त केलेल्या रकमेबाबत कोणताही राजकीय हेतू दिसून येत नसेल, तर संबंधित समित्यांनी त्यांच्या पातळीवर प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार आयोगाने आधीच दिलेले असल्याचे वरिष्ठ अधिकाºयाने याविषयी स्पष्ट केले.