शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

संसार उघड्यावर : बदलापूरमध्ये पुरात दीड हजार घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:48 IST

संसार उघड्यावर : वैद्यकीय यंत्रणा अजूनही अपुरी, पंचनाम्याला सुरूवात

बदलापूर : शहरात २६ जुलैच्या रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. सरकारी मदत पोहचवण्यासाठी पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे. सुमारे दीड हजार घरांचे आणि ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शहरात रोगराई पसरू नये यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले. पालिकेच्या पथकाबरोबरच विशेष पथक शहरात वैद्यकीय शिबिर घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी, हेंद्रेपाडा, गणेशनगर, दुबे बाग, भारत कॉलेज परिसर, दीपाली पार्क, शिवनगर, सर्वोदयनगर आदी भागातील सुमारे आठ ते दहा हजार घरांमध्ये पाणी शिरले होते, तर शहरातील सुमारे अडीच हजार दुकानांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्व वस्तू पाण्या खाली आल्याने त्या वापरण्याजोग्या राहिल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घरातील भिजलेले धान्य, गाद्या, कपडे बाहेर टाकले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून कचरा वेळीच उचलला जात आहे. घरातील महत्त्वाची कागदपत्रेही भिजली आहेत. या पुरामध्ये अंबरनाथ तालुक्यात ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या तहसील विभागामार्फत पूरग्रस्त घरांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देणार आहे. कचरा उचलण्याचे कामही सुरू असल्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले. आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता नसल्याचे डॉ अंकुश यांनी सांगितले. अतिरिक्त डॉक्टरांची व औषधांची मागणी सरकारकडे केली असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे