शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संसार उघड्यावर : बदलापूरमध्ये पुरात दीड हजार घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:48 IST

संसार उघड्यावर : वैद्यकीय यंत्रणा अजूनही अपुरी, पंचनाम्याला सुरूवात

बदलापूर : शहरात २६ जुलैच्या रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. सरकारी मदत पोहचवण्यासाठी पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे. सुमारे दीड हजार घरांचे आणि ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शहरात रोगराई पसरू नये यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले. पालिकेच्या पथकाबरोबरच विशेष पथक शहरात वैद्यकीय शिबिर घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी, हेंद्रेपाडा, गणेशनगर, दुबे बाग, भारत कॉलेज परिसर, दीपाली पार्क, शिवनगर, सर्वोदयनगर आदी भागातील सुमारे आठ ते दहा हजार घरांमध्ये पाणी शिरले होते, तर शहरातील सुमारे अडीच हजार दुकानांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्व वस्तू पाण्या खाली आल्याने त्या वापरण्याजोग्या राहिल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घरातील भिजलेले धान्य, गाद्या, कपडे बाहेर टाकले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून कचरा वेळीच उचलला जात आहे. घरातील महत्त्वाची कागदपत्रेही भिजली आहेत. या पुरामध्ये अंबरनाथ तालुक्यात ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या तहसील विभागामार्फत पूरग्रस्त घरांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देणार आहे. कचरा उचलण्याचे कामही सुरू असल्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले. आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता नसल्याचे डॉ अंकुश यांनी सांगितले. अतिरिक्त डॉक्टरांची व औषधांची मागणी सरकारकडे केली असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे