शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पुन्हा एकदा बहरला ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्टा, ज्येष्ठांनी दिला जुन्या गाण्यांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:50 IST

संगीतातील जादू इतकी मोठी आहे कि त्यातून मिळणारी मन:शांती व समाधान काही वेगळीच असते अशाच समाधानासाठी जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची निर्मिती किरण नाकती यांनी केली.

ठळक मुद्देपुन्हा एकदा बहरला ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्टाज्येष्ठांनी दिला जुन्या गाण्यांना उजाळावसंत पारु ंडेकर या दिव्यांग गायकांनी सादर केले ‘कैवध्याच्या चांदण्याचा’ हे गीत

ठाणे: ९२ वर्षीय भाटे काका व ८२ वर्षीय भालेराव काका या दोन्ही ज्येष्ठ गायकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.अभीर गुलाल उधळीत विठू माऊलीचा गजर करीत दिलीप नारखेडे यांच्या आवाजाने संगीत कट्ट्याची सुरुवात झाली. या कट्ट्याचे वैशिष्ट्य ठरले ते वसंत पारु ंडेकर या दिव्यांग गायकांनी सादर केलेले ‘कैवध्याच्या चांदण्याचा’ हे गीत. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनी टाळ््याची दाद दिली.

          शरद भालेराव यांनी ‘सवाबाईचा जोगवा’, प्रभाकर केळकर यांनी ‘जिक्र होता हे जब कयामत का’, विजया केळकर यांनी ‘ओ बसंती पावन पागल’, माधवी जोशी यांचे नाट्यगीत, वासुदेव फणसे यांनी ‘चाहुंगा मै तुझे’, प्रगती पोवळे यांनी ‘मेरे सपनो मे आना’, भाटे काका व संदीप गुप्ता यांनी ‘हमे और जिने कि चाहत ना होती’, संजय देशपांडे यांनी ‘बेकरार करके हमे यु ना’, मोरेश्वर ब्राह्मणे यांनी ‘आया है मुझे फिर याद वो जालीम’ ही गाणी आपल्या उत्स्फुर्त आवाजात सादर केली. तसेच विश्वास मुतालिक यांनी ‘अभंग’, सुधाकर कुलकर्णी यांनी ‘मेरा दिल भी कितना पागल’, व्यंकटेश कुलकर्णी यांनी ‘ओ रे ताल मिले के जल’, अविनाश भराटे यांनी ‘मैने चांद और सितारो की’, विष्णु डाकवाले यांनी ‘जाने कहा गये वो दिन’, विश्वनाथ कानासकर यांनी ‘सुहानी रात ढल चूकी’, प्रभात कुलकर्णी यांनी ‘आकाशी झेप घे रे’, अशोक गिरीं यांनी ‘पल पल दिल के पास’, सुहास चांदेकर यांनी रिमझिम गिरे सावन, विवेक जाधव यांनी छु लेने दो नाजुक ओठो को, सुप्रिया पाटील यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’, कीर्ती जोशी यांनी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’, तेजराव पंडागळे यांनी ‘वाजवलेली बासरी’, अदिती पावसकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ या गाण्यांनी तर रंगत आणली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या संपुर्ण ताकदीने गाणी सादर करीत होते. या कट्ट्याचे नियोजन आणि सुरेख व्यवस्था तसेच, कट्ट्यामागची किरण नाकती यांची नि:स्वार्थ भावन यांमुळेच संगीत कट्ट्याची आम्हाला ओढ असते अशा भावना या ज्येष्ठ गायकांनी व्यक्त केल्या. बोरिवली, डोंबिवली तसेच ठाणे शहरातील विविध भागांतील एकूण २८ गायकांनी आपली गायन कला सादर केली. या संगीत कट्ट्याचे निवेदन आदित्य नाकती याने केले. आम्हाला या कट्ट्यावर इतका आनंद मिळतोय की, आम्हाला असलेल्या आजारावर सुद्धा या गाण्यामुळे मात करता येते. हा संगीत कट्टा आमचे आयुष्य वाढवणारा ठरतोय असे मत गीतांजली बापट या ज्येष्ठ रसिकांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेmusicसंगीतMumbaiमुंबई