शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे

By नितीन पंडित | Updated: August 9, 2024 17:46 IST

मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गाचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालक, प्रवासी,चाकरमानी विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवास यातनामय झालेला असताना मुंबई नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याने नागरिक व प्रवाशांची अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले. या पाहणी दौऱ्यात आमदार शांताराम मोरे,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून यावर उपाय म्हणून अवजड वाहने वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्या पूर्वी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली.मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी येण्याच्या काही तास आधी पडघा टोल व्यवस्थापन व रस्ते विकास महामंडळ व बांधकाम प्रशासनाकडून तातडीने खड्ड्यांवर थातुर मातुर मलमपट्टी करण्यास सुरवात केली होती.या घाईघाईच्या खड्डे भराईच्या कामाचा स्थानिक नागरिकांनी प्रशासन टोल व्यवस्थापन कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbhiwandiभिवंडी