शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओम शिव गणेश इमारतीला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 03:13 IST

पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली.

डोंबिवली : पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या भिंतींना चिरादेखील गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीमधील २२ कुटुंबांना तत्काळ बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. यामुळे हे रहिवासी रस्त्यावर आले आहेत.ओम शिव गणेश सोसायटी २५ वर्षे जुनी असून, त्यात ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन विंग आहेत. सोसायटीची इमारत तळ अधिक तीन मजली आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात इमारत दुरुस्तीलायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सोमवारी ते काम सुरू असताना सायंकाळी तळ मजल्यावरील दोन खांब खचल्याचे दुरुस्ती करणाºया कंत्राटदाराच्या निदर्शनास आले. या वेळी मोठा आवाजही झाला. त्यामुळे कंत्राटदाराने लागलीच रहिवाशांना खाली उतरण्यास सांगून इमारत रिकामी करून घेतली. याची माहिती अग्निशामक विभाग, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती राहुल दामले, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजन मराठे, पप्पू म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजन यांच्या पत्नी ज्योती मराठे आणि पप्पू यांच्या पत्नी अलका म्हात्रे यांच्या प्रभागात ही इमारत आहे. दरम्यान, येथील रहिवाशांची सोय रात्रनिवारा केंद्रात करणार असल्याची माहिती पप्पू म्हात्रे यांनी दिली.>दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीनेइमारतीची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने सुरू होती, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. इमारतीच्या या अवस्थेला कंत्राटदार आणि सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही या वेळी करण्यात आला.विशेष म्हणजे काही रहिवाशांच्या रोषालाही कंत्राटदार आणि पदाधिकाºयांना सामोरे जावे लागले. घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.इमारतीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते, हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, पण माझे कोणी ऐकले नाही, अशा शब्दांत नाराजी रहिवासी कैलास पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.यासंदर्भात महापालिकेचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रोहिणी लोकरे यांनी तातडीने आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडी यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले. चिकोडी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार इमारत आधी तातडीने रिकामी करणे महत्त्वाचे आहे. वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमारत रिकामी झाल्यावर काही वेळातच तेथे लोखंडी मुंडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर, एकेका कुटुंबप्रमुखाला घरात सोडून महत्त्वाचा ऐवज तातडीने काढून घेण्याची तरतूद करावी लागेल. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे शेजारची इमारतही तातडीने रिकामी करावी आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन चिकोडी यांनी केले.>आता यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न?इमारत तातडीने रिकामी करायची झाल्यास येथे राहणाºया २२ कुटुंबीयांना तात्पुरता निवारा तरी कसा, कुठे, कधी देता येणार, हे प्रश्न महापालिका अधिकाºयांसमोर उभे राहिले आहेत. पर्यायी व्यवस्था न केल्यास ते बाहेर निघतील का? हा मोठा प्रश्न आहे. नागूबाई निवासच्या रहिवाशांना कचोºयातील बीएसयूपीच्या घरांमध्ये जसा निवारा मिळाला, तशी घरे ‘ओम शिव गणेश’च्या रहिवाशांना मिळणार का? आणि जर घरे मिळाली, तर त्या ठिकाणी येथील रहिवासी वास्तव्याला जाणार का? अशी चर्चा सुरू होती.