शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

ओम शिव गणेश इमारतीला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 03:13 IST

पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली.

डोंबिवली : पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या भिंतींना चिरादेखील गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीमधील २२ कुटुंबांना तत्काळ बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. यामुळे हे रहिवासी रस्त्यावर आले आहेत.ओम शिव गणेश सोसायटी २५ वर्षे जुनी असून, त्यात ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन विंग आहेत. सोसायटीची इमारत तळ अधिक तीन मजली आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात इमारत दुरुस्तीलायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सोमवारी ते काम सुरू असताना सायंकाळी तळ मजल्यावरील दोन खांब खचल्याचे दुरुस्ती करणाºया कंत्राटदाराच्या निदर्शनास आले. या वेळी मोठा आवाजही झाला. त्यामुळे कंत्राटदाराने लागलीच रहिवाशांना खाली उतरण्यास सांगून इमारत रिकामी करून घेतली. याची माहिती अग्निशामक विभाग, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती राहुल दामले, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजन मराठे, पप्पू म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजन यांच्या पत्नी ज्योती मराठे आणि पप्पू यांच्या पत्नी अलका म्हात्रे यांच्या प्रभागात ही इमारत आहे. दरम्यान, येथील रहिवाशांची सोय रात्रनिवारा केंद्रात करणार असल्याची माहिती पप्पू म्हात्रे यांनी दिली.>दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीनेइमारतीची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने सुरू होती, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. इमारतीच्या या अवस्थेला कंत्राटदार आणि सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही या वेळी करण्यात आला.विशेष म्हणजे काही रहिवाशांच्या रोषालाही कंत्राटदार आणि पदाधिकाºयांना सामोरे जावे लागले. घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.इमारतीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते, हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, पण माझे कोणी ऐकले नाही, अशा शब्दांत नाराजी रहिवासी कैलास पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.यासंदर्भात महापालिकेचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रोहिणी लोकरे यांनी तातडीने आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडी यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले. चिकोडी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार इमारत आधी तातडीने रिकामी करणे महत्त्वाचे आहे. वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमारत रिकामी झाल्यावर काही वेळातच तेथे लोखंडी मुंडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर, एकेका कुटुंबप्रमुखाला घरात सोडून महत्त्वाचा ऐवज तातडीने काढून घेण्याची तरतूद करावी लागेल. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे शेजारची इमारतही तातडीने रिकामी करावी आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन चिकोडी यांनी केले.>आता यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न?इमारत तातडीने रिकामी करायची झाल्यास येथे राहणाºया २२ कुटुंबीयांना तात्पुरता निवारा तरी कसा, कुठे, कधी देता येणार, हे प्रश्न महापालिका अधिकाºयांसमोर उभे राहिले आहेत. पर्यायी व्यवस्था न केल्यास ते बाहेर निघतील का? हा मोठा प्रश्न आहे. नागूबाई निवासच्या रहिवाशांना कचोºयातील बीएसयूपीच्या घरांमध्ये जसा निवारा मिळाला, तशी घरे ‘ओम शिव गणेश’च्या रहिवाशांना मिळणार का? आणि जर घरे मिळाली, तर त्या ठिकाणी येथील रहिवासी वास्तव्याला जाणार का? अशी चर्चा सुरू होती.