शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:35 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क किन्हवली : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, बदललेल्या हवामानामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत दोन दिवस शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे ग्रामीण भागातील चरीव, अदिवली, आष्टे, मुसई, बर्डेपाडा, अस्नोली, अंदाड, लेणाडसह अनेक गावांतील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकंदरीत ढगाळ वातावरण, धुके व अवकाळी पाऊस याचा मोठा परिणाम उत्पादन व बाजारभावावर होणार आहे. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. भेंडीबरोबरच हरभरा, काकडी, मिरची व टोमॅटो या पिकांनाही पावसाचा फटका बसला असून अतिपावसामुळे बुरशी व इतर रोगांमुळे उत्पादनात घट होणार आहे.लागवडीसाठी महागडे बी-बियाणे, खते, औषधे, मजूर यासाठी खूपच खर्च येतो. उत्पादनातून होणारा खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी आहेत. तालुक्यात अनेक बेरोजगार वीटभट्टीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकचा खर्च करून हा व्यवसाय करीत असताना सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे विटांचे खूप नुकसान झाले असून वीटभट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत आहेत. 

भेंडीचे बियाणे चार ते पाच हजार रुपये किलो आहे. लागवडीसाठी इतरही खूपच खर्च येतो.  हा खर्च कसा भरुन काढायचा  असा  प्रश्न आहे. अवकाळी पावसाने साहजिकच उत्पादन कमी होणार असून उत्पन्नही कमी होणार आहे. त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार आहे.    - तुषार पानसरे,     शेतकरी, चरीव 

टॅग्स :thaneठाणे