शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अवकाळी पावसामुळे शहापूरमधील भेंडी उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:35 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क किन्हवली : निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, बदललेल्या हवामानामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत दोन दिवस शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे ग्रामीण भागातील चरीव, अदिवली, आष्टे, मुसई, बर्डेपाडा, अस्नोली, अंदाड, लेणाडसह अनेक गावांतील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकंदरीत ढगाळ वातावरण, धुके व अवकाळी पाऊस याचा मोठा परिणाम उत्पादन व बाजारभावावर होणार आहे. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. भेंडीबरोबरच हरभरा, काकडी, मिरची व टोमॅटो या पिकांनाही पावसाचा फटका बसला असून अतिपावसामुळे बुरशी व इतर रोगांमुळे उत्पादनात घट होणार आहे.लागवडीसाठी महागडे बी-बियाणे, खते, औषधे, मजूर यासाठी खूपच खर्च येतो. उत्पादनातून होणारा खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी आहेत. तालुक्यात अनेक बेरोजगार वीटभट्टीचा व्यवसाय करत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकचा खर्च करून हा व्यवसाय करीत असताना सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे विटांचे खूप नुकसान झाले असून वीटभट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत आहेत. 

भेंडीचे बियाणे चार ते पाच हजार रुपये किलो आहे. लागवडीसाठी इतरही खूपच खर्च येतो.  हा खर्च कसा भरुन काढायचा  असा  प्रश्न आहे. अवकाळी पावसाने साहजिकच उत्पादन कमी होणार असून उत्पन्नही कमी होणार आहे. त्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार आहे.    - तुषार पानसरे,     शेतकरी, चरीव 

टॅग्स :thaneठाणे