शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:13 IST

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

ठाणे : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आधीच हिवाळ््यातील गारवा आणि त्यात पावसामुळे रहिवासी आणखीनच गारठून गेले. या वादळामुळे अनेक शाळा बंद राहिल्या. पावसाने वाहतूकही मंदावली आणि सर्व शहरे काही काळ ओकीबोकी झाली.ठाण्यात २०१० नंतरच्या दुसºया क्रमांकाच्या पावसाची नोंद या ओखीमुळे झाली. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. त्यामुले ठाणे शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ठाणे आपत्ती विभागाकडे १२ तक्रारी आल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉर्टसर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर सहा अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. कोपरीत खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाºया घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला देण्यास सुचवले होते. जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे त्यात म्हटले होते. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील देण्यात आल्या.भाजीपाला लागवडीला, अन्य पिकांना या पावसाचा फटका बसल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात पावसाने सुधारणा झाली. मात्र त्याची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली नाही.प्रचाराला पहिल्याच दिवशी पावसाने दिला फटकाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचे अतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचार सुरू होईल, अशी स्थिती होती, पण ओखी चक्रीवादळाने बदललेल्या हवामानाने त्यावर पाणी पडले. प्रचाराच्या नियोजनाची धूळधाण उडाली. कार्यकर्तेच गोळा होऊ न शकल्याने उमेदवारांना स्वत:च फिरून जमेल तेवढा प्रचार करावा लागल्याची माहिती पाचही तालुक्यांतून हाती आली आहे. ओखी चक्रीवादळामुळे शाळांना सुटी देण्यात आली. तरीही काही शाळा पूर्ण किंवा अर्धा दिवस सुरू असल्याने कुटुंबे घरात अडकून पडली. सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही दिवसभर अधूनमधून पडत होता. त्यामुळे शेती, पिकांवर लक्ष ठेवण्यात शेतकरी गुंतून गेले. भाजीपाल्याचे पीक घेणाºयांना या पावसाने तडाखा दिला. त्याच्यासह अन्य पिकांबाबत अंदाज घेण्याचे शेतकºयांचे काम दिवसभर सुरू होते.त्यामुळे ज्यांच्यासाठी प्रचार करायचा तेच जागेवर नसल्याने उमेदवारांचा विरस झाला. त्यातही अनेकांचे कार्यकर्तेच जमले नाहीत. खास करून महिला घरात, पावसामुळे कामात अडकून पडल्याने त्याही बाहेर पडल्या नाहीत. त्याचा फटका प्रचाराला बसला. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ