शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:13 IST

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

ठाणे : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आधीच हिवाळ््यातील गारवा आणि त्यात पावसामुळे रहिवासी आणखीनच गारठून गेले. या वादळामुळे अनेक शाळा बंद राहिल्या. पावसाने वाहतूकही मंदावली आणि सर्व शहरे काही काळ ओकीबोकी झाली.ठाण्यात २०१० नंतरच्या दुसºया क्रमांकाच्या पावसाची नोंद या ओखीमुळे झाली. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. त्यामुले ठाणे शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ठाणे आपत्ती विभागाकडे १२ तक्रारी आल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉर्टसर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर सहा अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. कोपरीत खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाºया घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला देण्यास सुचवले होते. जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे त्यात म्हटले होते. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील देण्यात आल्या.भाजीपाला लागवडीला, अन्य पिकांना या पावसाचा फटका बसल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात पावसाने सुधारणा झाली. मात्र त्याची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली नाही.प्रचाराला पहिल्याच दिवशी पावसाने दिला फटकाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचे अतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचार सुरू होईल, अशी स्थिती होती, पण ओखी चक्रीवादळाने बदललेल्या हवामानाने त्यावर पाणी पडले. प्रचाराच्या नियोजनाची धूळधाण उडाली. कार्यकर्तेच गोळा होऊ न शकल्याने उमेदवारांना स्वत:च फिरून जमेल तेवढा प्रचार करावा लागल्याची माहिती पाचही तालुक्यांतून हाती आली आहे. ओखी चक्रीवादळामुळे शाळांना सुटी देण्यात आली. तरीही काही शाळा पूर्ण किंवा अर्धा दिवस सुरू असल्याने कुटुंबे घरात अडकून पडली. सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही दिवसभर अधूनमधून पडत होता. त्यामुळे शेती, पिकांवर लक्ष ठेवण्यात शेतकरी गुंतून गेले. भाजीपाल्याचे पीक घेणाºयांना या पावसाने तडाखा दिला. त्याच्यासह अन्य पिकांबाबत अंदाज घेण्याचे शेतकºयांचे काम दिवसभर सुरू होते.त्यामुळे ज्यांच्यासाठी प्रचार करायचा तेच जागेवर नसल्याने उमेदवारांचा विरस झाला. त्यातही अनेकांचे कार्यकर्तेच जमले नाहीत. खास करून महिला घरात, पावसामुळे कामात अडकून पडल्याने त्याही बाहेर पडल्या नाहीत. त्याचा फटका प्रचाराला बसला. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ