शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरे हे काय! वाहतूक कोंडी होताच शाळेला सुट्टी; मनसे आमदाराचा चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 13:08 IST

Raju Patil MNS: वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या कारणामुळे चक्क शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. 

Raju Patil News: वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर होत चाललीये, याची प्रचिती देणारा प्रकार कल्याणमध्ये घडला. या प्रकारानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. 'आमच्या कल्याण डोंबिवलीकरांवर कोणती मेडिकल ईमरजन्सी आली तर त्या नातेवाईकांना करायचं काय?', असा संतप्त सवाल आमदार राजू पाटील यांनी केला. 

रस्तेमय खड्ड्यांबरोबरच आता वाहतूक कोंडींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहनांच्या वाढलेल्या संख्येने यात भर टाकली आहे. वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना सतत मनस्ताप सहन करावा लागत असताना आता चक्क शाळेच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. 

वाहतूक कोंडीवरून राजू पाटील इतके का संतापले?

आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवलेला मेसेज पोस्ट केला आहे. वाहतूक कोंडी झाल्याने शाळेची बस अडकली आहे. त्यामुळे अचानक शाळेला सुट्टी देण्यात आली आहे, असा मेसेज शाळेने पालकांना पाठवला आहे. 

यावरून आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. "प्रशासन बहिरं झालंय हे माहिती होतं पण आता आंधळंही झालंय वाटतं. कारण नागरिकांच्या समस्या दिसतचं नाही आहेत. वारंवार निदर्शनास आणून सुद्धा मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिकच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचा मात्र आजही कानाडोळा आहे. हे आजचंचं घ्या, ट्रॅफिक समस्या एवढी वाढलेय की शाळेच्या मुलांना सुट्टी जाहीर करावी लागली. हे असच सुरु राहिलं तर आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य ट्रॅफिकमध्येचं जाणारं वाटतं", असा सवाल राजू पाटलांनी केला आहे. 

 

मनसे आमदाराचा महायुतीच्या मंत्र्यांना टोला

राजू पाटलांनी मंत्र्यांना सहन न कराव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही बोट ठेवले. "उद्या जर आमच्या कल्याण डोंबिवलीकरांवर कोणती मेडिकल ईमरजन्सी आली तर त्या नातेवाईकांना करायचं काय? हाच जर मंत्र्याच्या रहदारीचा रस्ता असता तर बहुतेक ट्रॅफिकची समस्या झाली नसती. पण ही काय सर्वसमान्य जनता आहे. जनतेला गृहीत धरणं थांबवा आता", असे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.