शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:29 IST

प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष, ठाणे कार्यालयास कळवले

मीरा रोड : मीरा रोडच्या प्लेझंट पार्क भागात एका जागेवर पडलेली सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे सापडली. मात्र मीरा - भार्इंदर शिधावाटप कार्यालयाकडून पंचनामा करूनही ती ताब्यात घेण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रशासनच गंभीर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी ठाणे कार्यालयास कळवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू असे सहायक शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितले.मीरा- भार्इंदरमध्ये १२१ शिधावाटप दुकाने असून सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून येणाºया तूरडाळीपैकी सध्या केवळ २० दुकानांमध्ये २२ हजार किलो तूरडाळीचा पुरवठा झालेला आहे. तर उर्वरित दुकानांना अजूनही तूरडाळ मिळालेली नाही.सरकारकडून येणारी तूरडाळ एक किलोच्या बंद पाकिटात येते. शिधावाटप दुकानांवर ती ३५ रुपये किलोने विकली जाते. महत्वाचे म्हणजे एका कार्डधारकासाठी एक किलोच तूरडाळ दिली जाते. तूरडाळच नव्हे तर शिधावाटप दुकानावरून कुठलीही सरकारकडून येणारी वस्तू घ्यायची असेल तर यंत्रावर अंगठा जुळल्याशिवाय त्याची पावती येत नाही.तूरडाळीची शिधावाटप दुकानांवर टंचाई असताना दुसरीकडे मीरा रोडच्या प्लेझंट पार्कपासून मीरा गावकडे जाणाºया मार्गावरील एका जागेवर सरकारी तूरडाळीची असंख्य रिकामी पाकिटे टाकण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी शिवमावळा प्रतिष्ठानचे नामदेव काशिद यांना ही बाब कळताच त्यांनी याची माहिती शिधावाटप अधिकाºयांना कळवली. पाकिटांवर जून २०१८ छापलेले आहे. शिधावाटप अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.सरकार व संबंधित विभागाचे नाव छापलेली रिकामी पाकिटे ही सरकारी तूरडाळीची असल्याची खात्री पटल्यावर त्याची नोंद करून घेत ठाणे कार्यालयास पत्र पाठवले आहे.घटनास्थळी पडलेली सर्व पाकिटे जप्त करून घेणे आवश्यक असताना शिधावाटप अधिकाºयांनी ती ताब्यात घेतलीच नाहीत. वास्तविक पाकिटांची संख्या, त्याचा बॅच क्रमांक, दिनांक आदीची सविस्तर नोंद करून घेणे आवश्यक होते. यामुळे सरकारी तूरडाळीचा काळाबाजार केला जात असल्याची शक्यता बळावली आहे. मनसेनेही चौकशीची मागणी केली आहे.ठाणे कार्यालयातून अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सरकारी तूरडाळीची रिकामी ५० ते ६० पाकिटे सापडली आहेत. त्याच्या पडताळणीसाठी ठाणे कार्यालयास पत्र दिले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.- गणेश किरपाने, सहायक शिधावाटप अधिकारी.