शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचा-यांना उपस्थितीची राहण्याची सक्ती, अन्यथा होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:28 IST

मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिलाय.भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंह भुयारी मार्गाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाईंदर पश्चिम येथे येणार आहेत. वास्तविक आधी हा एकच कार्यक्रम घेण्यात आला होता. पण आज अचानक मीरारोड रेल्वे स्थानक परिसरच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रमदेखील घेण्यात आला आहे. भार्इंदर येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मीरारोडला जातील.उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना पत्र काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची तंबी दिली आहे. कार्यक्रमास उपस्थित न राहणारया अधिकारी - कर्मचारयांवर कारवाईचा इशारा म्हसाळ यांनी दिलाय.  परंतु शुक्रवारी दिवाळीचा पाडवा हा महत्वाचा सण असून नंतर भाऊबीज आहे. शिवाय त्या दिवशी सुट्टी आहेच. सलग सुट्या असल्याने त्यातच मोठा सण असल्याने अनेक अधिकारी - कर्मचारी गावी वा नातेवाईकांकडे सहकुटुंब गेले आहेत. त्यातच सध्या एसटीचा संप पण आहे. त्यामुळे पालिकेने उपस्थित राहण्याची केलेली सक्ती अधिकारी व कर्मचा-यांना अडचणीची ठरली आहे. माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेनेच्या कामगार संघटनेचे अरुण कदम यांनी मात्र सणासुदीला कार्यक्रम घ्यायचा वरुन अधिकारी - कर्मचा-यांना सक्ती करणे निषेधार्ह असून नसती दांडगाई सहन केली जाणार नाही, असे सुनावले आहे.वास्तविक मीरारोड स्थानक पारसिराचे सुशोभिकरणाचे बहुतांशी काम झालेले असून प्रवाशी त्याचा वापर आधीपासूनच करत आहेत. त्यामुळे पुन्हा सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपुजनचा कार्यक्रम पालिकेने ठेवल्याने आता तेथे सुद्धा उपस्थिती लावावी लागणार आहे.

पाली जेट्टी हायमास्टने उजळलीमीरारोड - पाली जेट्टी येथील परीसर अखेर हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाला आहे. नगरसेवक असताना मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी पाली जेट्टीच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. जेट्टीचे दुस-या टप्प्याचे काम झाले असून किना-यावर काळोख असल्याने मच्छिमारांच्या सोयीसाठी डिमेलो यांनी हायमास्ट दिवे बसवण्याची मागणी केली होती.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस