शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पदाधिकारी निवड; भाजपात धुसफूस

By admin | Updated: February 15, 2016 03:00 IST

एक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यां

जितेंद्र कालेकर,  ठाणेएक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकमान्यनगर- सावरकरनगर मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक १४ जानेवारी २०१६ रोजी पार पडली. यामध्ये आदेश भगत, योगेश भोईर आणि कैलास म्हात्रे या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मंडळ अध्यक्ष म्हणून सचिन मोरे यांचे नाव जाहीर केले, असा आरोपही शर्मा यांनी केला. २३ वर्षांत अशी निवडणूक झाली नाही. जुने मंडळ कार्यकर्ते, अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच इच्छुकांना डावलून ही नियुक्ती केल्याने नाराज झालेले शर्मा तसेच लक्ष्मीकांत पाठारे, राकेश गुप्ता, मुकुंद काळे अशा सुमारे २२ कार्यकर्त्यांचा गट एकवटला आहे. त्यांनी ही नाराजी प्रदेशाध्यक्षांसह ठाणे विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर आणि नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुळात, वॉर्ड कमिटी झाल्याशिवाय मंडळ अध्यक्षाची घोषणा होत नाही. लोकमान्यनगर विभागात वॉर्ड ९ अ आणि ब, १३ ब, १५ ब तसेच २६ ब अशा पाच वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती केली नसून वॉर्ड १० च्या अध्यक्षांच्या नियुक्तीलाही आक्षेप घेतला आहे. वॉर्ड १६ मधून नीरज मिश्रा, १५- अमित सिंग, १३ विजय दुबे, २६ किरण दतुरे आणि १४ मुक्तानंद सिंग अशा १४ पैकी केवळ सहा वॉर्ड अध्यक्षांचीच नियुक्ती झाली आहे. सर्व अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच मंडळ अध्यक्षांची निवड केली जाते. आठ जणांची निवड बाकी असतानाही मंडळ अध्यक्षांची निवड झाल्याने ही नाराजी आहे. मुळात, बुथप्रमुखांच्या नियुक्तीमध्येच मंडळ अध्यक्षांचे नाव घोषित करण्यात आले.