शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पदाधिकारी निवड; भाजपात धुसफूस

By admin | Updated: February 15, 2016 03:00 IST

एक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यां

जितेंद्र कालेकर,  ठाणेएक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकमान्यनगर- सावरकरनगर मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक १४ जानेवारी २०१६ रोजी पार पडली. यामध्ये आदेश भगत, योगेश भोईर आणि कैलास म्हात्रे या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मंडळ अध्यक्ष म्हणून सचिन मोरे यांचे नाव जाहीर केले, असा आरोपही शर्मा यांनी केला. २३ वर्षांत अशी निवडणूक झाली नाही. जुने मंडळ कार्यकर्ते, अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच इच्छुकांना डावलून ही नियुक्ती केल्याने नाराज झालेले शर्मा तसेच लक्ष्मीकांत पाठारे, राकेश गुप्ता, मुकुंद काळे अशा सुमारे २२ कार्यकर्त्यांचा गट एकवटला आहे. त्यांनी ही नाराजी प्रदेशाध्यक्षांसह ठाणे विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर आणि नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुळात, वॉर्ड कमिटी झाल्याशिवाय मंडळ अध्यक्षाची घोषणा होत नाही. लोकमान्यनगर विभागात वॉर्ड ९ अ आणि ब, १३ ब, १५ ब तसेच २६ ब अशा पाच वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती केली नसून वॉर्ड १० च्या अध्यक्षांच्या नियुक्तीलाही आक्षेप घेतला आहे. वॉर्ड १६ मधून नीरज मिश्रा, १५- अमित सिंग, १३ विजय दुबे, २६ किरण दतुरे आणि १४ मुक्तानंद सिंग अशा १४ पैकी केवळ सहा वॉर्ड अध्यक्षांचीच नियुक्ती झाली आहे. सर्व अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच मंडळ अध्यक्षांची निवड केली जाते. आठ जणांची निवड बाकी असतानाही मंडळ अध्यक्षांची निवड झाल्याने ही नाराजी आहे. मुळात, बुथप्रमुखांच्या नियुक्तीमध्येच मंडळ अध्यक्षांचे नाव घोषित करण्यात आले.