शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

ओखीतील पावसाने केली भाजीच्या शेतीची नासाडी; उत्तन परिसरातील भाजीपाला शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:52 IST

भार्इंदरमध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरु झाली. यानंतर जोर धरलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकला होता.

- राजू काळे भार्इंदर - ओखीच्या वादळात ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यात उत्तन परिसरातील भाजीपाल्याच्या शेतीची चांगलीच नासाडी झाली असून त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीडित शेतकरी सरकार दरबारी मागणी करु लागले आहेत.

मीरा- भार्इंदरमध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरु झाली. यानंतर जोर धरलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकला होता. पावसाच्या या अवकाळी संततधारेमुळे उत्तन परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे १५ ते २० एकर क्षेत्रात लावलेल्या भाजीपाल्याची नासाडी झाली असून त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीडित शेतकरी सरकारच्या मदतीची प्रतिक्षा करीत आहेत. 

उत्तन हे पश्चिम सागरी किनाऱ्यावर वसलेले ठिकाण असल्याने येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. हा व्यवसायही सततच्या तेल सर्व्हेक्षणासह परप्रांतीय व पर्ससीन नेटवाल्यांच्या साम्राज्यामुळे बेताचा झाला आहे. त्यामुळे येथील काही मच्छिमार व ग्रामस्थ मासेमारीला जोडव्यवसाय म्हणून भात व भाजीपाला शेती करतात. तसेच इतर परिसरातील ग्रामस्थ मात्र शेतीवरच आपला उदरनिर्वाह चालवितात. भातशेती पावसाळ्यात बहरत असली तरी मागील ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने या शेतीचे नुकसान केले होते. त्यावेळी भाजीपाल्याची शेती पीक कापणीला आल्याने वाचली होती. मात्र यंदा ओखीच्या वादळात कोसळलेल्या अवकाळी पावसाने त्या शेतीचे नुकसान केले. येथील तारोडी, डोंगरी, आनंदनगर, तलावली आदी परिसरातील शेतकरी पावसाळ्यातील भाताच्या शेतीनंतर हिवाळ्यात भाजीपाल्याचे मोठे पीक घेतात. यातील विशेष म्हणजे येथील आरोग्यवर्धक ठरणाऱ्या सफेद कांद्यांना बाजारात मोठी मागणी असते. या शेतकऱ्यांना स्थानिक तसेच आठवडा बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने ताजा भाजीपाला भार्इंदरमधील नागरीकांना उपलब्ध होतो. परंतु, त्याचे ओखीच्या पावसात नुकसान झाल्याने सुमारे १५ ते २० एकर मध्ये सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांनी लावलेल्या सफेद कांद्यांची रोपे, पालक, चवळी, वांगी, भोपळा, कोथिंबिर, दुधी, मिरची, टोमॅटो आदीं भाजीपाल्यांची नासाडी झाल्याचे शेतकरी एडविन व विक्टर बस्त्याव नुनीस, लेस्ली बोर्जिस, न्यूटन मनू व फॅन्की चार्ली दालमेत, स्टिफन फ्रान्सिस, लियो इनास, संजय रोमन, जॉनी सापेद नुनीस, डॅरल जोसेफ नून यांनी सांगितले. या पिडीत शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्याने त्यांना नव्याने पीक घेण्यासाठी बियाणे खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्याचे दुहेरी संकट त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. परंतु, तारोडी येथील शेतकरी स्वयं सहाय्यता गटाच्या माध्यमातुन त्यांना किमान अर्थसहाय्य दिले जात असली तरी पुरेशी नुकसान-भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पीकाचा पंचनामा करावा, यासाठी पिडीत शेतकरी पाठपुरावा करीत असल्याचे डोंगरी येथील प्रेरणा सेवा केंद्राचे सेवक टेनिसन बेलू यांनी सांगितले.