शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:43 IST

जागा नसल्याचा पालिकेचा कांगावा; स्मार्ट सिटीचा गवगवा फसवा, पाच लाख लोकसंख्येची हेळसांड

- अजित मांडके ठाणे : एकीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिका मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करत आहे. परंतु, दुसरीकडे पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात असूनही तेथे एकही आरोग्य केंद्र नसल्याची बाब दिव्यात आलेल्या पुरानंतर प्रकर्षाने समोर आली आहे. दिव्यात अनधिकृत इमले उभे राहत आहेत, त्यांना इतर सोयीसुविधा दिल्या जात आहेत. येथील अनेक आरक्षणात फेरबदल केले जात आहेत. परंतु, असे असताना आरोग्य केंद्रासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या दिव्याखाली अंधार अशीच काहीशी गत झाली आहे.शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्रीपर्यंत आपला जोर कायम ठेवला होता. सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरीदेखील दिवा या भागात साचलेले पाणी मात्र काही ओसरलेले नाही. सोमवारी सायंकाळपासून ते ओसरण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी आता पालिकेची कोणतीही आरोग्याची सोय नसल्याने या भागातील रहिवाशांसमोर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दिव्याच्या विकासासाठी उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, टीएमटी डेपो आदींसह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिवाय, काही महत्त्वाच्या सुविधांसाठी या भागातील काही आरक्षणांमध्ये बदल करण्याचे प्रस्तावही मागील काही महासभांमध्ये मंजूर झाले आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचा जयघोष पालिकेकडून केला जात आहे. असे असताना पाच लाख लोकसंख्येला आरोग्य केंद्र नाही. ही स्मार्ट सिटीच्या दिशेने चालणाऱ्या ठाणे शहरासाठी अतिशय चिंतेची व खेदाची गोष्ट आहे. या भागात आरोग्य केंद्र सुरू व्हावे, यासाठी काही दक्ष नागरिकांनी तसेच काही राजकीय मंडळींनी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही पालिकेला जाग आली नसल्याचेच दिसत आहे. आता पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर येथील सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनाही या भागात आरोग्य केंद्र नसल्याचे शहाणपण आले आहे. त्यामुळेच आता काहींनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.दुसरीकडे या भागात आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी जागाच नसल्याचा कांगावा पालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. या भागात अनधिकृत इमारती बांधण्यासाठी आणि त्याठिकाणी आपली खळगी भरून राजकीय पोळी भाजण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. मात्र, आरोग्य केंद्रासाठी जागा नाही, हे पालिकेचे म्हणणे थोडे अजबच ठरणारे आहे.सध्या या भागातील रहिवाशांना खाजगी डॉक्टर किंवा अगदीच पालिकेचे आरोग्य केंद्र गाठायचे झाले, तर तीन ते चार किमीचे अंतर कापून खिशाला कात्री देऊन शीळ भागात जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेला आता तरी जाग येईल का, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.यासंदर्भात उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात पालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्यापही पालिकेला जाग आलेली नाही.आगासन येथे पोलीस स्टेशन, प्रभाग समिती कार्यालय आणि आरोग्य केंद्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यानुसार, येत्या काळात ते काम सुरू होण्याची अपेक्षा त्यांनी त्यांनी व्यक्त केली.दिवा गावात आरोग्य केंद्र नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते सुरू करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, त्याची माहिती घेऊन पुढे काय कार्यवाही करायची, ते निश्चित केले जाईल.- डॉ. हरदास गुजर, आरोग्य अधिकारी, ठामपा

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य