शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पोलीस चौक्यांमध्ये अडगळीचे सामान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:02 IST

येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र या चौक्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आलेला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही. यामुळे या रस्त्यावर चौक्यांचे प्रयोजन काय? या बद्दल खुलासा करावा अन्यथा ठाण्यातील सर्व वाहतूक पोलीस चौक्यां ताबडतोब अन्यत्र हलविण्यात याव्या.

ठळक मुद्देचौक्या लवकरात लवकर हटविणे बाबत योग्य ती कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेपण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही.

ठाणे : ऐन गर्दीच्या वेळी ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक पोलिस चौक्यांचा वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत असल्याचे वास्तव येथील राम मारूती मार्ग तसेच स्टेशनजवळील अलोक हॉटेल परिसरातील वाहतूक पोलीस चौक्यांवरून उघड होत आहे. या चौक्यांचा वापर अडगळीतील सामान ठेवण्यासाठी असल्याचमुळे त्या वेळीच हटवण्याची मागणी नौपा्यातील जेष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी वाहतूक पोलीस उप आयुक्ैत अमित काळे यांच्याकडे लावून धरली आहे.      येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र या चौक्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आलेला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही. यामुळे या रस्त्यावर चौक्यांचे प्रयोजन काय? या बद्दल खुलासा करावा अन्यथा ठाण्यातील सर्व वाहतूक पोलीस चौक्यां ताबडतोब अन्यत्र हलविण्यात याव्या. या चौक्याचा वापर होत नाही, मात्र गर्दीच्यावेळी या चौक्या वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेल नसल्याची खंत मोने यांनी व्यक्त करून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले आहे.       या चौक्या हटवण्या विषयीच्या आॅगस्टमधील पत्रास अनुसरून मोने यांना ‘वापरात नसलेल्या वाहतूक पोलिसांच्या चौक्या लवकरात लवकर हटविणे बाबत योग्य ती कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे’ असे सप्टेंबरमध्ये वाहतूक शाखेकडून आलेल्या पत्रात स्पष्ट केले. मात्र आजमितीस त्यास बरोबर एक महिना होत आहे. पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलटपक्षी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे मोने यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मधांतरीच्या काळात काही राजकीय पक्षांनी सदर चौक्यांचा वापर चक्क आपल्या नेत्यांचे फलक लावणायसाठी केला. तक्रारी केली असता ते फलक केवळ हटविण्यात आले, पण संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही मोने यांनी सांगितले.............फोटो - ०५ठाणे वाहतूक पोलीस चौक्या

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी