शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 19, 2016 02:04 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात ४५ टक्के कपात केली. पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के गळती होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रत्येक प्रभागात बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे. एका महिन्यात पालिकेने २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून एप्रिल महिनाअखेर ३५० बोअरवेल खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शहरात ६३० जुन्या बोअरवेलपैकी ४०० सुस्थितीत आहेत. त्यापैकी २६० बोअरवेल सुरू असून १०० कायमच्या बंद झाल्या आहेत. तर, ४५ बोअरवेलची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, अशी आशा नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी) नदीकिनारी बोअरवेलची मागणी बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत तज्ज्ञांचे असून स्वत:चा पाणीस्रोत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. तसेच सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील एमआयडीसीचे पंप ताब्यात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा उभी करण्याचा मानस अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवला.