शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 19, 2016 02:04 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात ४५ टक्के कपात केली. पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के गळती होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रत्येक प्रभागात बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे. एका महिन्यात पालिकेने २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून एप्रिल महिनाअखेर ३५० बोअरवेल खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शहरात ६३० जुन्या बोअरवेलपैकी ४०० सुस्थितीत आहेत. त्यापैकी २६० बोअरवेल सुरू असून १०० कायमच्या बंद झाल्या आहेत. तर, ४५ बोअरवेलची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, अशी आशा नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी) नदीकिनारी बोअरवेलची मागणी बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत तज्ज्ञांचे असून स्वत:चा पाणीस्रोत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. तसेच सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील एमआयडीसीचे पंप ताब्यात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा उभी करण्याचा मानस अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवला.