शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 19, 2016 02:04 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात ४५ टक्के कपात केली. पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के गळती होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रत्येक प्रभागात बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे. एका महिन्यात पालिकेने २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून एप्रिल महिनाअखेर ३५० बोअरवेल खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शहरात ६३० जुन्या बोअरवेलपैकी ४०० सुस्थितीत आहेत. त्यापैकी २६० बोअरवेल सुरू असून १०० कायमच्या बंद झाल्या आहेत. तर, ४५ बोअरवेलची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, अशी आशा नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी) नदीकिनारी बोअरवेलची मागणी बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत तज्ज्ञांचे असून स्वत:चा पाणीस्रोत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. तसेच सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील एमआयडीसीचे पंप ताब्यात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा उभी करण्याचा मानस अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवला.