शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2023 18:02 IST

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गमभागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना रोचा ताजा, गरम व पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांनी आबळ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्दारे जिल्ह्यातील शहरांमधील व ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस बालकांसाठी सतर्क आहेत. या बालकांसह केंद्रातील कुपोषित बालकांच्या औषधोपचाराची काळजी या सेविका, मदतनीस घेत आहे. त्यामुळे कुपोषण कमी होण्यास मोठा हातभार लागलेला आहे. पण त्यांच्या आवश्यक मागण्यांसाठी शासन लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यस्तरीय संप आझााद मैदानावर सुरू आहे. या बेमुदत संपाचा आजचा १५ दिवस आहे. या कालावधीत राेज मिळणाऱ्या पोषण आहारापासून ही बालके, गरोदर माता या ताज्या, गरम पोषण आहारापासून वंचित आहेत.

या अंगणवाडी सेविका दरदिवशी ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी बालकांना ताजा गरम आहार शिजवून देत होत्या. पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाभार्थ्यांच्या तोंड पोषण आहार थांबला आहे. त्यांचे रोजचे वजन, उंची होत नसल्यामुळे कुपोषणाची खरी माहिती शासनापर्यंत पोहचत नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या बालकांचे १५ दिवसाच्या कालावधीत लाथार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे. याविषयी ठाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी संजय बागुल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहार वाटपात मोठ्या प्रमाणात खंड झा‘ल्याचे उघड होत आहे.

टॅग्स :thaneठाणे