शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2023 18:02 IST

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गमभागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना रोचा ताजा, गरम व पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांनी आबळ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्दारे जिल्ह्यातील शहरांमधील व ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस बालकांसाठी सतर्क आहेत. या बालकांसह केंद्रातील कुपोषित बालकांच्या औषधोपचाराची काळजी या सेविका, मदतनीस घेत आहे. त्यामुळे कुपोषण कमी होण्यास मोठा हातभार लागलेला आहे. पण त्यांच्या आवश्यक मागण्यांसाठी शासन लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यस्तरीय संप आझााद मैदानावर सुरू आहे. या बेमुदत संपाचा आजचा १५ दिवस आहे. या कालावधीत राेज मिळणाऱ्या पोषण आहारापासून ही बालके, गरोदर माता या ताज्या, गरम पोषण आहारापासून वंचित आहेत.

या अंगणवाडी सेविका दरदिवशी ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी बालकांना ताजा गरम आहार शिजवून देत होत्या. पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाभार्थ्यांच्या तोंड पोषण आहार थांबला आहे. त्यांचे रोजचे वजन, उंची होत नसल्यामुळे कुपोषणाची खरी माहिती शासनापर्यंत पोहचत नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या बालकांचे १५ दिवसाच्या कालावधीत लाथार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे. याविषयी ठाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी संजय बागुल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहार वाटपात मोठ्या प्रमाणात खंड झा‘ल्याचे उघड होत आहे.

टॅग्स :thaneठाणे