शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भातसा नदीला आलेल्या पुरात रोपवाटिका गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:54 IST

महिला उद्योजिकांचे नुकसान; क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते

आसनगाव : मागील आठदिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच शनिवारी भातसा धरणाचे पाच दरवाजे २ मीटरने उघडल्याने भातसा नदीने रौद्ररूप धारण केले होते. शहापूरला जोडणारा भातसा नदीवरील सापगाव पूल सात फुटांपेक्षा जास्त पाण्याखाली गेला होता. या पुरात सापगाव पुलाजवळ असलेली रोपवाटिका वाहून गेली. यात शेतकरी, महिला उद्योजिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.शहापूर तालुक्यातील शेतकरी विद्या फर्डे व समृद्धी चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत उद्योजिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भातसा नदीच्या पात्राजवळ सापगाव शिवमंदिराच्या शेजारी भाड्याने जागा घेऊन कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या आणि हितचिंतकांच्या मदतीने सहा महिन्यांपूर्वी रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला. या रोपवाटिकेत रत्नागिरी येथील उत्तम दर्जाची देवगड हापूस, केशर, रत्ना, सिंधू, तोतापुरी, लंगडा अशी हजारो आंब्यांची कलमे याचबरोबर चिकू, नारळ, पेरू, काजू अशी अनेक विविध प्रकारची फळझाडे तसेच सोनचाफा, गुलाब, अनेक शोभीवंत फुलझाडे विक्रीसाठी उपलब्ध होती.रोपवाटिका शहापूर- किन्हवली- डोळखांब- मुरबाड या मुख्य रस्त्यावर आहे. शनिवारी सायंकाळी भातसा नदीच्या महापुरात क्षणात होत्याचे नव्हते झाले. रोपवाटिकेच्या नदीपात्राच्या बाजूला असलेली दगड, विटा सिमेंटची संरक्षक भिंत पाण्याच्या वेगवान प्रवाहाने खचली. पुराच्या पाण्यात एकही झाड शिल्लक न राहता सर्वच्यासर्व झाडे वाहून गेली. दरम्यान, रोपवाटिकेतील मजूर व त्यांची मुले यांना व्यवस्थापक समीर चौधरी यांनी सुरक्षितस्थळी हलवले.

टॅग्स :floodपूर