शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत स्त्रियांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:28 IST

आधुनिक काळात छोट्या कुटुंबांकडे कल : अनेक गैरसमजांमुळे पुरुषांचे मात्र प्रमाण कमी

- हितेन नाईकपालघर : भारतातील लोकसंख्येचा विचार केल्यास लोकसंख्यास्फोट, वाढती महागाई आणि मर्यादित साधनसामग्री यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत असून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत आहे. त्यामुळे कुटुंबात एक किंवा जास्तीत जास्त दोन अपत्ये असावीत असा कल दाम्पत्यांचा राहिलेला आहे. दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी स्त्रियांनाच पुढे केले जात असल्याचे दिसून येत असून या अनेक गैरसमजांमुळे या शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण मात्र कमी असल्याचे आढळून आले आहे.डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संतती नियमन केल्याने अकारण गर्भपाताची वेळ उद्भवत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूल जन्माला घालण्याबाबत दाम्पत्यांना कुटुंबनियोजनाचा सल्ला आणि साधने उपलब्ध करून दिली जातात. जोडप्यांमध्ये सुरक्षित शरीर संबंध, पत्नीवर मातृत्व न लादणे आणि लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंब नियोजनाची त्रिसूत्री आहे. कुटुंब नियोजनात पुरुषाच्या शुक्रवाहिन्या नलिका कट कराव्या लागत असल्याने अशा शस्त्रक्रियेसाठी पुरुषवर्ग तयार होत नाही. उलट त्यासाठी महिलांना पुढे केले जाऊन त्यांच्यावर लॅप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया अथवा गर्भाशयाच्या मुखाजवळ डायफ्रेम बसविली जाते.गेल्या वर्षात  कुटुंब नियोजनासाठी पालघरमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत मार्च २०१९ पर्यंत आर ३ गटात ६१०३ चे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यातील ६०२७ (९९ टक्के)उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर आर ५ गटात मिळून (खासगी हॉस्पिटल मिळून) ७९३८ म्हणजे १३० टक्के काम झाले आहे. तर मार्च २०२० पर्यंत आर ३ गटात ६१०३ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ५४४७ (८९ टक्के) उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर आर ५ गटात मिळून (खासगी हॉस्पिटल मिळून) ७९३९ म्हणजे १३० टक्के काम झाले आहे.पुरुषांसाठी सोपी उपाययोजना, तरीही गैरसमज कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया मोहिमेअंतर्गत महिलांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांसाठी अगदी सहज, सोपी उपाययोजना केली जात असून त्यांच्यावर स्कालपेन नेस (कुठलेही शस्त्र न लावता) शस्त्रक्रिया केली जात असल्याचे शासकीय रुग्णालयात मागील २९ वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी लोकमतला सांगितले, परंतु आपली सेक्सपॉवर कमी होईल, अंडाशय काढली जातील, लिंगातील ताठरपणा कमी होईल का? अशा गैरसमजुतीमुळे पुरुष संतती नियमन करण्यास पुढे येत नाहीत.कुटुंब नियोजन मोहिमेअंतर्गत महिलांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांसाठी अगदी सहज, सोपी उपाययोजना केली जाते. त्यांच्यावर कुठलेही शस्त्र न लावता शस्त्रक्रिया केली जात असते. मात्र तरीही पुरुषांचा प्रतिसाद खूपच कमी आहे.               - डॉ. राजेंद्र चव्हाणमहिला होताहेत सजग कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया मोहिमेअंतर्गत जनजागृती केली जात असते. यातून महिला सजग होत असून एक किंवा दोन मुलांवर समाधान मानण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.