शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आगरी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:33 IST

आगरी महोत्सवाचे उद्घाटन, विविध कार्यक्रमांची आठवडाभर मेजवानी

डोंबिवली : आगरी समाजाचा एकमेव खासदार ही बाब समाजासाठी भूषणावह नाही. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे. राजकीयदृष्ट्या समाज प्रबळ झाला पाहिजे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे केले.आगरी यूथ फोरमने येथील क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, उद्योगपदी शंकर भोईर, माजीमंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेविका प्रमिला चौधरी, सुनीता पाटील व आयोजक गुलाब वझे आदी उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाले की, ‘आगरी समाजाचा एकमेव खासदार हे काही समाजाचे भूषण नाही. समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी विविध पदांवर निवडून आल्यास समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मग कोणाची आगरी-कोळी समाजावर अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. आगरी समाजाची ओळख काय तर माणुसकी आणि जिव्हाळा. तर, दुर्गुण काय तर तो कोणाची लवकर स्तुती अथवा कौतुक करीत नाही. चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. समाजाने धनाएवजी वैचारिकदृष्ट्या श्रीमंत झाले पाहिजे. आगरी महोत्सवावर काहींनी टीका केली आहे. माणूस मोठा झाल्यावरच तो टिकेचे लक्ष्य होतो. आगरी समाज जोपर्यंत या भूतलावर आहे, तोपर्यंत महोत्सव होतच राहील.’आमदार पवार म्हणाले, ‘आगरी समाजाचे एकमेव खासदार पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद देण्याची मागणी आगरी-कोळी समाजातर्फे आगरी यूथ फोरमने केल्यास ती मागणी सरकारकडे लावून धरली जाईल.’ उपमहापौर भोईर म्हणाल्या, ‘आगरी समाजात मुलीच्या जन्माला खूप महत्त्व आहे. बेटी ही धनाची पेटी समजली जाते. ‘बेटी बचाव’ ही मोहीम केंद्र सरकार राबवत असले तरी आगरीसमाज पूर्वापारपासून बेटी बचाव करीत आहे.’ माजीमंत्री पाटील म्हणाले, ‘महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सोळावं वरीस धोक्याचे असे म्हणतात. त्यानुसार समाजातील व्यक्तींकडून आयोजनाविषयी टीका झाली. या अर्थाने सोळावे वरीस धोक्याचे आहे.’‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, गावांतील घरांची बंद केलेली नोंदणी पुन्हा सुरू करावी. कल्याण ग्रोथ सेंटर आणि कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण करताना भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये, याचा पुनर्रुच्चार वझे यांनी केला. महोत्सवावर टीका करणाऱ्या कोण्या एका व्यक्तीला हिशेब देण्यासाठी आगरी यूथ फोरम बांधील नाही. आगरी समाजाशी आमची बांधिलकी आहे, असे वझे यांनी ठासून सांगितले. दरम्यान, ‘कणसा’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. साहित्यिक सुरेश देशपांडे व त्यांच्या सहकाºयांनी त्याचे संपादन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.लवकरच बैठकआगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली जाईल. भूमिपूत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी यावेळी दिली.दरम्यान,उद्घाटन सोहळ्यांनंतर विविध गटांतील मुलांनी नृत्याविष्कार सादर केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याण