शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगरी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:33 IST

आगरी महोत्सवाचे उद्घाटन, विविध कार्यक्रमांची आठवडाभर मेजवानी

डोंबिवली : आगरी समाजाचा एकमेव खासदार ही बाब समाजासाठी भूषणावह नाही. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे. राजकीयदृष्ट्या समाज प्रबळ झाला पाहिजे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे केले.आगरी यूथ फोरमने येथील क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, उद्योगपदी शंकर भोईर, माजीमंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेविका प्रमिला चौधरी, सुनीता पाटील व आयोजक गुलाब वझे आदी उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाले की, ‘आगरी समाजाचा एकमेव खासदार हे काही समाजाचे भूषण नाही. समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी विविध पदांवर निवडून आल्यास समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मग कोणाची आगरी-कोळी समाजावर अन्याय करण्याची हिंमत होणार नाही. आगरी समाजाची ओळख काय तर माणुसकी आणि जिव्हाळा. तर, दुर्गुण काय तर तो कोणाची लवकर स्तुती अथवा कौतुक करीत नाही. चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. समाजाने धनाएवजी वैचारिकदृष्ट्या श्रीमंत झाले पाहिजे. आगरी महोत्सवावर काहींनी टीका केली आहे. माणूस मोठा झाल्यावरच तो टिकेचे लक्ष्य होतो. आगरी समाज जोपर्यंत या भूतलावर आहे, तोपर्यंत महोत्सव होतच राहील.’आमदार पवार म्हणाले, ‘आगरी समाजाचे एकमेव खासदार पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद देण्याची मागणी आगरी-कोळी समाजातर्फे आगरी यूथ फोरमने केल्यास ती मागणी सरकारकडे लावून धरली जाईल.’ उपमहापौर भोईर म्हणाल्या, ‘आगरी समाजात मुलीच्या जन्माला खूप महत्त्व आहे. बेटी ही धनाची पेटी समजली जाते. ‘बेटी बचाव’ ही मोहीम केंद्र सरकार राबवत असले तरी आगरीसमाज पूर्वापारपासून बेटी बचाव करीत आहे.’ माजीमंत्री पाटील म्हणाले, ‘महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सोळावं वरीस धोक्याचे असे म्हणतात. त्यानुसार समाजातील व्यक्तींकडून आयोजनाविषयी टीका झाली. या अर्थाने सोळावे वरीस धोक्याचे आहे.’‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, गावांतील घरांची बंद केलेली नोंदणी पुन्हा सुरू करावी. कल्याण ग्रोथ सेंटर आणि कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण करताना भूमिपूत्रांवर अन्याय होऊ नये, याचा पुनर्रुच्चार वझे यांनी केला. महोत्सवावर टीका करणाऱ्या कोण्या एका व्यक्तीला हिशेब देण्यासाठी आगरी यूथ फोरम बांधील नाही. आगरी समाजाशी आमची बांधिलकी आहे, असे वझे यांनी ठासून सांगितले. दरम्यान, ‘कणसा’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. साहित्यिक सुरेश देशपांडे व त्यांच्या सहकाºयांनी त्याचे संपादन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.लवकरच बैठकआगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली जाईल. भूमिपूत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी यावेळी दिली.दरम्यान,उद्घाटन सोहळ्यांनंतर विविध गटांतील मुलांनी नृत्याविष्कार सादर केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याण