शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:43 IST

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे.

- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गतवेळेपेक्षा तीन हजार अतिरिक्त मतदार नोंदले आहेत. मात्र, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मतदारांची संख्या घटली आहे.जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपेक्षित आहे. या निवडणुकीत उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून निवडून येण्याकरिता मतदारनोंदणीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे घडलेले नाही. मागील निवडणुकीत एक लाख नऊ हजार मतदार होते. यावेळी हीच संख्या ९० हजारांच्या घरात आली आहे. निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या मतदारसंघातील आधीची यादीच रद्द करण्यात येऊन नव्याने मतदारनोंदणी करण्यात आली. आधीच्या यादीत काहींची नावे ही दुबार होती, तर काही बोगस नावांचा त्यात समावेश होता.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली. दुसºया टप्प्याची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण झाली. १९ जानेवारीला या दोन्ही टप्प्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार, आता मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटली असून केवळ ९० हजार २५२ मतदारांची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत १८ हजार ७४८ एवढे मतदार घटले आहेत.दरम्यान, १९८८ पासून ते मागील निवडणुकीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७ हजार ६३३ मते मिळाली होती. तर, भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव झाला. त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. राष्टÑवादीने तिकीट नाकारल्याने निलेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु, ऐनवेळेस त्यांना मनसेने पाठिंबा दिला होता. मनसेची साथ मिळूनही त्यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.मतदारांची संख्या वाढण्याऐवजी घटली१९८८ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हा चार जिल्ह्यांत सहा हजार मतदार होते. पहिल्या निवडणुकीत भाजपाचे वसंतराव पटवर्धन यांनी बाजी मारली. १९९४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या १२ हजारांवर आणि २००० मध्ये १८ हजारांवर गेली. या दोन्ही निवडणुकांत भाजपाचे अशोक मोडक यांनी बाजी मारली. २००६ मध्ये भाजपाचे संजय केळकर विजयी झाले. त्यांचा दोन हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्यासमोर राष्टÑवादीचे निलेश चव्हाण रिंगणात होते. तेव्हा मतदारांची संख्या ६६ हजारांवर गेली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख नऊ हजारांवर गेला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या घटून ९० हजार २५२ झाली आहे.मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर होती. दोन टप्प्यांत नोंदणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जूनपर्यंत आलेले मतदारांचे अर्ज स्वीकारावे, अशा सूचनादेखील निवडणूक अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तसे कोणतेही आदेश न आल्याने मतदारांची नोंदणी प्रक्रिया थांबली असल्याचे आक्षेप आता घेतले जात आहेत.ठाणे जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठी घटमागील निवडणुकीत सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील मतदार होते. त्यांची संख्या ६६ हजार ४८० एवढी होती. परंतु, यंदा मात्र त्यामध्येच सर्वात मोठी घसरण झाली असून आता मतदारांची संख्या ३७ हजार २५४ एवढीच नोंदली आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गातील मतदारांची असलेली ६२ हजार ४६ संख्या घटून जेमतेम चार हजार ५८७ वर आली आहे. रायगडमधील २४ हजार १५८ मतदारांची संख्या ही १७ हजार ७६९, रत्नागिरी १२ हजार ४६५ मतदारांची संख्या वाढून १५ हजार ५०७ वर गेली आहे. नव्याने तयार झालेल्या पालघर मतदारसंघात तब्बल १५ हजार १३५ मतदारांची नोंद झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे