शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:43 IST

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे.

- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गतवेळेपेक्षा तीन हजार अतिरिक्त मतदार नोंदले आहेत. मात्र, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मतदारांची संख्या घटली आहे.जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपेक्षित आहे. या निवडणुकीत उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून निवडून येण्याकरिता मतदारनोंदणीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे घडलेले नाही. मागील निवडणुकीत एक लाख नऊ हजार मतदार होते. यावेळी हीच संख्या ९० हजारांच्या घरात आली आहे. निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या मतदारसंघातील आधीची यादीच रद्द करण्यात येऊन नव्याने मतदारनोंदणी करण्यात आली. आधीच्या यादीत काहींची नावे ही दुबार होती, तर काही बोगस नावांचा त्यात समावेश होता.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली. दुसºया टप्प्याची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण झाली. १९ जानेवारीला या दोन्ही टप्प्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार, आता मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटली असून केवळ ९० हजार २५२ मतदारांची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत १८ हजार ७४८ एवढे मतदार घटले आहेत.दरम्यान, १९८८ पासून ते मागील निवडणुकीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७ हजार ६३३ मते मिळाली होती. तर, भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव झाला. त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. राष्टÑवादीने तिकीट नाकारल्याने निलेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु, ऐनवेळेस त्यांना मनसेने पाठिंबा दिला होता. मनसेची साथ मिळूनही त्यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.मतदारांची संख्या वाढण्याऐवजी घटली१९८८ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हा चार जिल्ह्यांत सहा हजार मतदार होते. पहिल्या निवडणुकीत भाजपाचे वसंतराव पटवर्धन यांनी बाजी मारली. १९९४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या १२ हजारांवर आणि २००० मध्ये १८ हजारांवर गेली. या दोन्ही निवडणुकांत भाजपाचे अशोक मोडक यांनी बाजी मारली. २००६ मध्ये भाजपाचे संजय केळकर विजयी झाले. त्यांचा दोन हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्यासमोर राष्टÑवादीचे निलेश चव्हाण रिंगणात होते. तेव्हा मतदारांची संख्या ६६ हजारांवर गेली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख नऊ हजारांवर गेला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या घटून ९० हजार २५२ झाली आहे.मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर होती. दोन टप्प्यांत नोंदणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जूनपर्यंत आलेले मतदारांचे अर्ज स्वीकारावे, अशा सूचनादेखील निवडणूक अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तसे कोणतेही आदेश न आल्याने मतदारांची नोंदणी प्रक्रिया थांबली असल्याचे आक्षेप आता घेतले जात आहेत.ठाणे जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठी घटमागील निवडणुकीत सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील मतदार होते. त्यांची संख्या ६६ हजार ४८० एवढी होती. परंतु, यंदा मात्र त्यामध्येच सर्वात मोठी घसरण झाली असून आता मतदारांची संख्या ३७ हजार २५४ एवढीच नोंदली आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गातील मतदारांची असलेली ६२ हजार ४६ संख्या घटून जेमतेम चार हजार ५८७ वर आली आहे. रायगडमधील २४ हजार १५८ मतदारांची संख्या ही १७ हजार ७६९, रत्नागिरी १२ हजार ४६५ मतदारांची संख्या वाढून १५ हजार ५०७ वर गेली आहे. नव्याने तयार झालेल्या पालघर मतदारसंघात तब्बल १५ हजार १३५ मतदारांची नोंद झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे