शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पदवीधर मतदारांची संख्या २० हजारांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:43 IST

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे.

- अजित मांडकेठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारनोंदणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटल्याचे दिसून आले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गतवेळेपेक्षा तीन हजार अतिरिक्त मतदार नोंदले आहेत. मात्र, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मतदारांची संख्या घटली आहे.जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपेक्षित आहे. या निवडणुकीत उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून निवडून येण्याकरिता मतदारनोंदणीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे घडलेले नाही. मागील निवडणुकीत एक लाख नऊ हजार मतदार होते. यावेळी हीच संख्या ९० हजारांच्या घरात आली आहे. निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या मतदारसंघातील आधीची यादीच रद्द करण्यात येऊन नव्याने मतदारनोंदणी करण्यात आली. आधीच्या यादीत काहींची नावे ही दुबार होती, तर काही बोगस नावांचा त्यात समावेश होता.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली. दुसºया टप्प्याची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण झाली. १९ जानेवारीला या दोन्ही टप्प्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार, आता मतदारांची संख्या सुमारे २० हजारांनी घटली असून केवळ ९० हजार २५२ मतदारांची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत १८ हजार ७४८ एवढे मतदार घटले आहेत.दरम्यान, १९८८ पासून ते मागील निवडणुकीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७ हजार ६३३ मते मिळाली होती. तर, भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव झाला. त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. राष्टÑवादीने तिकीट नाकारल्याने निलेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु, ऐनवेळेस त्यांना मनसेने पाठिंबा दिला होता. मनसेची साथ मिळूनही त्यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.मतदारांची संख्या वाढण्याऐवजी घटली१९८८ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हा चार जिल्ह्यांत सहा हजार मतदार होते. पहिल्या निवडणुकीत भाजपाचे वसंतराव पटवर्धन यांनी बाजी मारली. १९९४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या १२ हजारांवर आणि २००० मध्ये १८ हजारांवर गेली. या दोन्ही निवडणुकांत भाजपाचे अशोक मोडक यांनी बाजी मारली. २००६ मध्ये भाजपाचे संजय केळकर विजयी झाले. त्यांचा दोन हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्यासमोर राष्टÑवादीचे निलेश चव्हाण रिंगणात होते. तेव्हा मतदारांची संख्या ६६ हजारांवर गेली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख नऊ हजारांवर गेला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या घटून ९० हजार २५२ झाली आहे.मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर होती. दोन टप्प्यांत नोंदणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जूनपर्यंत आलेले मतदारांचे अर्ज स्वीकारावे, अशा सूचनादेखील निवडणूक अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तसे कोणतेही आदेश न आल्याने मतदारांची नोंदणी प्रक्रिया थांबली असल्याचे आक्षेप आता घेतले जात आहेत.ठाणे जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठी घटमागील निवडणुकीत सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील मतदार होते. त्यांची संख्या ६६ हजार ४८० एवढी होती. परंतु, यंदा मात्र त्यामध्येच सर्वात मोठी घसरण झाली असून आता मतदारांची संख्या ३७ हजार २५४ एवढीच नोंदली आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गातील मतदारांची असलेली ६२ हजार ४६ संख्या घटून जेमतेम चार हजार ५८७ वर आली आहे. रायगडमधील २४ हजार १५८ मतदारांची संख्या ही १७ हजार ७६९, रत्नागिरी १२ हजार ४६५ मतदारांची संख्या वाढून १५ हजार ५०७ वर गेली आहे. नव्याने तयार झालेल्या पालघर मतदारसंघात तब्बल १५ हजार १३५ मतदारांची नोंद झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे