शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

भिवंडी वनपरिक्षेत्रात वणव्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

वज्रेश्वरी : गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगल जळून ...

वज्रेश्वरी : गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे, तसेच वनसंपत्तीची हानी झाली आहे.

शिकार, कोळसा मिळविण्यासाठी आणि गवतामधील प्लॉट मोकळे व्हावे आदी कारणांसाठी काही लोक आगी लावत आहेत. परंतु आगींमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर जंगलातील लहान प्राणी, सरपटणारे लहान जीव आदी वन्यप्राणी आणि किमती झाडे यांचा नाहक बळी जात आहे. भिवंडी तालुक्यातील सर्व जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहे. परंतु या आगींमुळे वनस्पती आणि वनविभागाने लावलेली झाडे नष्ट होत आहेत. वनविभागाचे अधिकारी डोंगर भागातील गावांमध्ये जाऊन या प्रकरणी जनजागृती करण्याचे काम करून आग लावणे हा गुन्हा असून शिक्षा होऊ शकते, असे पटवून देऊनही आगी लावण्याचे प्रमाण वाढतच आहे.

पारिवली, पडघा, दुगाड, चिंबीपाडा, पिलंझे, कुहे, दिघाशी, गणेशपुरी, कांबा आदी सर्व वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून आगी लागत आहेत.

दुगाड वनपरिक्षेत्रात वज्रेश्वरी जवळील गुमतारा किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठी आग लागली असता येथील वनपाल सुधीर फडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री एकपर्यंत आग विझवून आटोक्यात आणली. परंतु वन कर्मचारी यांच्याकडे आगी विझविण्यासाठी पुरेशी साधने नसल्याने आणि डोंगराच्यावर उपलब्ध साधने नेऊ शकत नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. यामुळे नागरिकांनीच जागरूक राहून आगी लावणाऱ्यांची माहिती वनविभाग अथवा पोलिसांना देऊन सहकार्य केल्यास आगी लावण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.