शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

भिवंडी वनपरिक्षेत्रात वणव्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

वज्रेश्वरी : गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगल जळून ...

वज्रेश्वरी : गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे, तसेच वनसंपत्तीची हानी झाली आहे.

शिकार, कोळसा मिळविण्यासाठी आणि गवतामधील प्लॉट मोकळे व्हावे आदी कारणांसाठी काही लोक आगी लावत आहेत. परंतु आगींमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर जंगलातील लहान प्राणी, सरपटणारे लहान जीव आदी वन्यप्राणी आणि किमती झाडे यांचा नाहक बळी जात आहे. भिवंडी तालुक्यातील सर्व जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहे. परंतु या आगींमुळे वनस्पती आणि वनविभागाने लावलेली झाडे नष्ट होत आहेत. वनविभागाचे अधिकारी डोंगर भागातील गावांमध्ये जाऊन या प्रकरणी जनजागृती करण्याचे काम करून आग लावणे हा गुन्हा असून शिक्षा होऊ शकते, असे पटवून देऊनही आगी लावण्याचे प्रमाण वाढतच आहे.

पारिवली, पडघा, दुगाड, चिंबीपाडा, पिलंझे, कुहे, दिघाशी, गणेशपुरी, कांबा आदी सर्व वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून आगी लागत आहेत.

दुगाड वनपरिक्षेत्रात वज्रेश्वरी जवळील गुमतारा किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठी आग लागली असता येथील वनपाल सुधीर फडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री एकपर्यंत आग विझवून आटोक्यात आणली. परंतु वन कर्मचारी यांच्याकडे आगी विझविण्यासाठी पुरेशी साधने नसल्याने आणि डोंगराच्यावर उपलब्ध साधने नेऊ शकत नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. यामुळे नागरिकांनीच जागरूक राहून आगी लावणाऱ्यांची माहिती वनविभाग अथवा पोलिसांना देऊन सहकार्य केल्यास आगी लावण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.