शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2024 16:43 IST

गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कवींना कातरवेळी लिहायला आवडते. कातरवेळेला सूर्य मावळतो, आकाश उदास व्हायला लागते, तेव्हा शब्दांची निर्मिती जास्त होते. तिन्ही सांजा या शहरात दिसत नाही कारण आपले आभाळच खिडकी एवढे झाले आहे . गावाला गेल्यावर मात्र लांब क्षितीज दिसते. त्यातील तिव्ही सांजा त्यातील सूर्य मावळताना तुम्हाला टाटा करुन जातो आणि गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

कवी उद्धव वाघमारे यांच्या 'सांजवेळ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते मंगला हायस्कूल येथे संपन्न झाले. यावेळी प्रा. बागवे म्हणाले की, कवितेतील भावना या गद्य लिखाणात सापडत नाही. अंतर्नाद हा कविलाच कळत असतो. माणूस गेला तरी त्याची अक्षरे राहतात. सांजवेळ ही कवीच्या सृजनशीलतेला आव्हान देणारी असते. त्यांच्या गावाकडच्या कवितांमधील निसर्गसौंदर्याचे विशेष त्यांनी अधोरेखित केले. कवितेत भावनांची पेरणी पाहिजे; वैचारिकता हा कवितेचा गुणधर्म नाही असेही ते म्हणाले. प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या अनुभवांचा प्रामाणिकपणा, कवितेमधली सरलता, सुगमता हा या संग्रहाचा विशेष आहे. सांजवेळेत होणारी जशी रंगांची विलोभनीय उधळण असते तसे भावनांचे रंग या कवितासंग्रहात आहेत.

कवी गीतेश शिंदे म्हणाले की, वाघमारे यांचा हा पहिलाच संग्रह असला तरी आयुष्यभर त्यांनी कवितेची केलेली साधना दिसते. वाघमारे यांनी आपल्या मनोगतात त्यांचा खडतर प्रवास मांडला. मी स्वतः रुढार्थाने कवी नाही, पण मला कविता लिहिणे आवडते. माझे अनुभव मी कवितेतून मांडत गेलो असेही ते म्हणाले. तपस्या नेवे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणे