शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2024 16:43 IST

गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कवींना कातरवेळी लिहायला आवडते. कातरवेळेला सूर्य मावळतो, आकाश उदास व्हायला लागते, तेव्हा शब्दांची निर्मिती जास्त होते. तिन्ही सांजा या शहरात दिसत नाही कारण आपले आभाळच खिडकी एवढे झाले आहे . गावाला गेल्यावर मात्र लांब क्षितीज दिसते. त्यातील तिव्ही सांजा त्यातील सूर्य मावळताना तुम्हाला टाटा करुन जातो आणि गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

कवी उद्धव वाघमारे यांच्या 'सांजवेळ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते मंगला हायस्कूल येथे संपन्न झाले. यावेळी प्रा. बागवे म्हणाले की, कवितेतील भावना या गद्य लिखाणात सापडत नाही. अंतर्नाद हा कविलाच कळत असतो. माणूस गेला तरी त्याची अक्षरे राहतात. सांजवेळ ही कवीच्या सृजनशीलतेला आव्हान देणारी असते. त्यांच्या गावाकडच्या कवितांमधील निसर्गसौंदर्याचे विशेष त्यांनी अधोरेखित केले. कवितेत भावनांची पेरणी पाहिजे; वैचारिकता हा कवितेचा गुणधर्म नाही असेही ते म्हणाले. प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या अनुभवांचा प्रामाणिकपणा, कवितेमधली सरलता, सुगमता हा या संग्रहाचा विशेष आहे. सांजवेळेत होणारी जशी रंगांची विलोभनीय उधळण असते तसे भावनांचे रंग या कवितासंग्रहात आहेत.

कवी गीतेश शिंदे म्हणाले की, वाघमारे यांचा हा पहिलाच संग्रह असला तरी आयुष्यभर त्यांनी कवितेची केलेली साधना दिसते. वाघमारे यांनी आपल्या मनोगतात त्यांचा खडतर प्रवास मांडला. मी स्वतः रुढार्थाने कवी नाही, पण मला कविता लिहिणे आवडते. माझे अनुभव मी कवितेतून मांडत गेलो असेही ते म्हणाले. तपस्या नेवे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणे