शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

हल्ली शहरातील आभाळच खिडकीएवढे झाले आहे; अशोक बागवे यांची खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2024 16:43 IST

गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कवींना कातरवेळी लिहायला आवडते. कातरवेळेला सूर्य मावळतो, आकाश उदास व्हायला लागते, तेव्हा शब्दांची निर्मिती जास्त होते. तिन्ही सांजा या शहरात दिसत नाही कारण आपले आभाळच खिडकी एवढे झाले आहे . गावाला गेल्यावर मात्र लांब क्षितीज दिसते. त्यातील तिव्ही सांजा त्यातील सूर्य मावळताना तुम्हाला टाटा करुन जातो आणि गंमत म्हणजे ते संपूर्ण क्षितीजच तुमच्या कवितेत येते अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.

कवी उद्धव वाघमारे यांच्या 'सांजवेळ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते मंगला हायस्कूल येथे संपन्न झाले. यावेळी प्रा. बागवे म्हणाले की, कवितेतील भावना या गद्य लिखाणात सापडत नाही. अंतर्नाद हा कविलाच कळत असतो. माणूस गेला तरी त्याची अक्षरे राहतात. सांजवेळ ही कवीच्या सृजनशीलतेला आव्हान देणारी असते. त्यांच्या गावाकडच्या कवितांमधील निसर्गसौंदर्याचे विशेष त्यांनी अधोरेखित केले. कवितेत भावनांची पेरणी पाहिजे; वैचारिकता हा कवितेचा गुणधर्म नाही असेही ते म्हणाले. प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या अनुभवांचा प्रामाणिकपणा, कवितेमधली सरलता, सुगमता हा या संग्रहाचा विशेष आहे. सांजवेळेत होणारी जशी रंगांची विलोभनीय उधळण असते तसे भावनांचे रंग या कवितासंग्रहात आहेत.

कवी गीतेश शिंदे म्हणाले की, वाघमारे यांचा हा पहिलाच संग्रह असला तरी आयुष्यभर त्यांनी कवितेची केलेली साधना दिसते. वाघमारे यांनी आपल्या मनोगतात त्यांचा खडतर प्रवास मांडला. मी स्वतः रुढार्थाने कवी नाही, पण मला कविता लिहिणे आवडते. माझे अनुभव मी कवितेतून मांडत गेलो असेही ते म्हणाले. तपस्या नेवे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणे