शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता जातीयवादी इतिहास लिहिला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:14 IST

होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

ठाणे : ऐतिहासिक लेखन करत असताना लेखकाची निर्मिती हीच महत्त्वाची असते. काही ठिकाणी तो तर्क देत असतो. इतिहास हा विषय असे आपल्या मनावर शालेय जीवनापासून बिंबवले जाते. त्याला सरकार व शिक्षण खाते जबाबदार आहे, असे डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितले. मुलांना सनावळीत अडकवून न ठेवता इतिहास हा विषय रंजक व गोष्टीवेल्हाळ पद्धतीने शिकवला पाहिजे. रहस्य व साहसकथा वाचल्यावर वाचक इतिहासाच्या पुस्तकाकडे वळतो. ओगले यांनी गांधी हत्या हे पुस्तक लिहिले आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचले पाहिजे. इतिहासाने जातीपातीमध्ये फाटाफूट होणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल शेवडे यांनी यावेळी केला. ओगले यांचे महाराज यशवंतराव होळकर हे पुस्तक वाचले पाहिजे. होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, ‘व्यास’चे अध्यक्ष निलेश गायकवाड, मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश भडसावळे व प्रास्ताविक गायकवाड यांनी केले.

आपल्याकडील इतिहासलेखनाला दोन बाजू आहेतएक इतिहास ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे. दुसरा देशीय इतिहासकारांनी लिहिला आहे. आता जातीयवादी इतिहास लिहिला जात आहे. इतिहासकारांनी इतिहासातील ही जळमटे दूर केली पाहिजेत. ही जबाबदारी इतिहासलेखन करणाऱ्यांची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे केले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय व व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचा पुस्तक आदानप्रदान महोत्सव संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने लेखक अनंत ओगले लिखित महाराज यशवंतराव होळकर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी उपरोक्त विधान केले.

मोदी अभ्यासाचा विषयमोदी हा अभ्यासाचा विषय आहे. मोदींनी २०१४ पूर्वीच जातीपातीचे राजकारण सोडले आहे. मोदींना ३०० जागा मिळणार, हे पत्रकारांना समजले नाही. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याऐवजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात थेट जनतेशी संवाद साधत मतदारांना बांधून ठेवले. मोदींनी प्रचंड विरोध केल्याने ते अधिक स्ट्राँग झाले, असे शेवडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी