शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

आता जातीयवादी इतिहास लिहिला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:14 IST

होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

ठाणे : ऐतिहासिक लेखन करत असताना लेखकाची निर्मिती हीच महत्त्वाची असते. काही ठिकाणी तो तर्क देत असतो. इतिहास हा विषय असे आपल्या मनावर शालेय जीवनापासून बिंबवले जाते. त्याला सरकार व शिक्षण खाते जबाबदार आहे, असे डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितले. मुलांना सनावळीत अडकवून न ठेवता इतिहास हा विषय रंजक व गोष्टीवेल्हाळ पद्धतीने शिकवला पाहिजे. रहस्य व साहसकथा वाचल्यावर वाचक इतिहासाच्या पुस्तकाकडे वळतो. ओगले यांनी गांधी हत्या हे पुस्तक लिहिले आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचले पाहिजे. इतिहासाने जातीपातीमध्ये फाटाफूट होणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल शेवडे यांनी यावेळी केला. ओगले यांचे महाराज यशवंतराव होळकर हे पुस्तक वाचले पाहिजे. होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, ‘व्यास’चे अध्यक्ष निलेश गायकवाड, मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश भडसावळे व प्रास्ताविक गायकवाड यांनी केले.

आपल्याकडील इतिहासलेखनाला दोन बाजू आहेतएक इतिहास ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे. दुसरा देशीय इतिहासकारांनी लिहिला आहे. आता जातीयवादी इतिहास लिहिला जात आहे. इतिहासकारांनी इतिहासातील ही जळमटे दूर केली पाहिजेत. ही जबाबदारी इतिहासलेखन करणाऱ्यांची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे केले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय व व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचा पुस्तक आदानप्रदान महोत्सव संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने लेखक अनंत ओगले लिखित महाराज यशवंतराव होळकर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी उपरोक्त विधान केले.

मोदी अभ्यासाचा विषयमोदी हा अभ्यासाचा विषय आहे. मोदींनी २०१४ पूर्वीच जातीपातीचे राजकारण सोडले आहे. मोदींना ३०० जागा मिळणार, हे पत्रकारांना समजले नाही. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याऐवजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात थेट जनतेशी संवाद साधत मतदारांना बांधून ठेवले. मोदींनी प्रचंड विरोध केल्याने ते अधिक स्ट्राँग झाले, असे शेवडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी