शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आता लक्ष्य शून्य कचरा मोहिमेचे!

By admin | Updated: January 23, 2017 05:21 IST

केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना यावर उपाय म्हणून प्रत्येक प्रभागात शून्य कचरा मोहीम राबवण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याची माहिती स्थायी सभापती रमेश म्हात्रे यांनी दिली. येत्या अंदाजपत्रकात विशेष आर्थिक निधीची तरतूद करणार असून स्वच्छतेची हमी देणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रभागांना तेथील सोसायट्यांना तसेच सामाजिक संस्थांना गौरवण्यात येऊन तेथील विकासासाठी राखीव निधी दिला जाईल, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.रविवारी कोपर रोड प्रभागात गावदेवी मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. अशी मोहीम एक दिवस राबवून कचऱ्याची समस्या सुटणारी नाही. त्यासाठी सर्वच प्रभागांत विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे म्हात्रे म्हणाले. वेंगुर्ला नगरपालिका स्वच्छतेबाबत राज्यात पहिला क्रमांक पटकावते. कागल नगरपालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीसारखा प्रकल्प उभा करते, अशी उदाहरणे समोर असताना आपल्याकडे गोळा होणाऱ्या ६५० टन कचऱ्यातूनही खत, वीजनिर्मितीसारखे प्रकल्प उभे राहू शकतात, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. कचरा आपल्या दारात नको, अशी प्रत्येकाची धारणा असते. डम्पिंगला विरोध होत असताना कचऱ्यावर उपाय म्हणून उभारणाऱ्या बायोगॅस प्रकल्पालाही ठिकठिकाणी हरकत घेत आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम नगरसेवकांनी करायला हवे. (प्रतिनिधी)