शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पायाभूत परीक्षा आता शाळाच घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:06 IST

विद्यार्थ्यास गेल्या वर्गाचा अभ्यासक्रम कितपत लक्षात आहे, याची चाचपणी करणारी पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा शासन

सुरेश लोखंडे ठाणे : विद्यार्थ्यास गेल्या वर्गाचा अभ्यासक्रम कितपत लक्षात आहे, याची चाचपणी करणारी पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा शासन पातळीवर म्हणजे महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाव्दारे घेतली जात असे. दुसरी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना द्यावी लागत असे. ही परीक्षा आता शालेय पातळीवर घेण्याचे आदेश जारी करण्यात आले. यामुळे प्रश्न पत्रिका कमी मिळाल्यास, झेरॉक्स करताना पेपर फुटला आदी उद्भवणाऱ्या समस्या आणि मनस्तापातून प्रशासन मुक्त झाले आहे.विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वीच्या वर्गातील अभ्यासक्रमावर पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा द्यावी लागत असे. इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाºया या परीक्षेव्दारे त्यांना गेल्या वर्गातील अभ्यासक्रम कितपत ज्ञात आहे, याची चाचपणी करण्यात येत असे. तोंडी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून हे मूल्यमापन होत असे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्सच्या दुकानावर विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीच विकत मिळायच्या. या परीक्षा कालावधीत होणारी बदनामी आता टळल्याचे शैक्षणिक क्षेत्रात ऐकायला मिळते.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ या चाचणीचे आयोजन राज्यस्तरावरून करण्यात येणार नाही. या मूल्यमापन चाचणीचे नियोजन शाळास्तरावर करण्याचे आदेश महाराष्टÑ विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनिल मार यांनी जारी केले आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाव्दारे शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची ही पायाभूत, मूल्यमापन चाचणी राज्यस्तरावरून घेण्यात येत असे. आता ही जबाबदारी संबंधित शाळांवर देण्यात आली आहे.