शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

यापुढे एक दिवसाआड पाणी ?

By admin | Updated: January 26, 2016 02:01 IST

सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील

कल्याण : सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली असून परिणामी कल्याण-डोंबिवलीसह इतर पालिकांवर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र महिनाभरातच कपातीचा दिवस वाढवून एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेचा जलउद््भव असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सोमवारी ०. ८० मीटर इतकी खालावल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी लागू करण्यात आलेली ३० टक्के पाणी कपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावली आणि आम्हाला पाणीटंचाईतून वगळल्याची भूमिका त्यांनी गेतली. त्यांच्याकडून जास्तीचे पाणी उचलले जात आहे. त्यामुळे लघू पाटबंधारे विभाग नेमकी कोणती कारवाई करणार ते समजू शकलेले नाही. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग क्षेत्रांच्या कार्यालयाबाहेर पालिकेने उल्हास नदीतील पाण्याची पातळी खालावल्याचा फलक लावला आहे. उल्हास नदीतून कल्याण-डोंबिवली पालिकेप्रमाणेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आणि स्टेम पाणीपुरवठा योजना पाणी उचलतात. पाण्याचा प्रवाह नियमीत असल्यास बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जात नाही. सध्या तो कमी झाल्याने बारवी व आंध्र धरणातून दररोज एकूण एक हजार ५०० दशलक्ष पाणी लिटर सोडले जाते. ही दोन्ही धरणे यंदा पूर्ण भरलेली नाहीत. त्यातील पाणीसाठयाचे नियोजन करण्यासाठी लघू पाटबंधारे खात्याने ३० टक्के पाणीकपात नोव्हेंंबरपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मिरा-भाईंदर पालिका हद्दीतील पाणी कपात रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून या महापालिकेने कपातीची अंमलबजावणी केली नाही. नदी पात्रातून दररोज जास्तीचे पाणी उचलले. त्याचा ताण कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागावर आला. नियोजन कोलमडून पडले. परिणामी, सोमवारी कल्याण-डोंबिवलीत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. काही भागात पाणीच आले नाही. शहरभर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. (प्रतिनिधी)