शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:51 IST

पत्रीपुलाची फेरबांधणी : पाच मीटरने वाढ, एमएसआरडीसीपुढील अडचणी वाढल्या, गणेशोत्सवानंतर पाडकाम

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांचे सूत जुळता जुळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ८४ मीटर लांबीचा पूल उभारण्यासाठी आराखडा बनविण्याचे नियोजन एमएसआरडीसी करीत होते, पण आता पुन्हा रेल्वेने पुलाची लांबी पाच मीटरने वाढवत तो ८९ मीटरचा हवा, असा नवा फतवा काढला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीची डोकेदुखी वाढली आहे.

एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पुलाची लांबी आणखी पाच मीटरने वाढविण्यासंदर्भात नुकतेच रेल्वेने कळवले. त्यानुसार आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे, पण त्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरात आराखडा बनवून सर्व वरिष्ठांच्या संमतीनंतर तो रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात येण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून मंजुरीसाठी नेमका किती अवधी लागेल हे आता काहीच सांगता येणार नाही.’ रेल्वेने आधी पुलाच्या लांबीसाठी ६०, ७२, ८४ आणि आता ८९ मीटरची अट घातली आहे. प्रत्येक वेळेस रेल्वे पुलाची लांबी वाढवत असल्याने आराखडा बनविण्यापासून सर्वच बाबींमध्ये विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जुन्या पत्रीपुलावर गणेशोत्सवानंतरच हातोडा पडणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा पूल २५ आॅगस्टला पाडायचा होता. त्यासाठी पूर्ण नियोजनही झाले होते, पण आता हे नियोजन पुढे ढकलले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी मात्र बंदच राहील, असा पवित्राही रेल्वे प्रशासनाने घेतल्याने कल्याणमध्ये वाहतूककोंडी कायम आहे.पूल अद्यापही बंदचशिवसेनेने शनिवारी आंदोलन करून जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्या वेळी रेल्वेने पत्रीपूल पादचाºयांसाठी शनिवार, २५ आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, सोमवारपर्यंत तो खुला झालेला नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केली पाहणीच्जुना पत्रीपूल बंद केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सोमवारी दुपारी पत्रीपुलाची पाहणी करून शहरातील एकूणच वाहतूककोंडीचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ उपस्थित होते.च्जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय रेल्वेने २५ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवला आहे. त्या अनुषंगाने अमित काळे यांनी या पुलाची पाहणी करून वाहतूककोंडीचा आढावा घेतला. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक वाहतूक अधिकाºयांना सूचना केल्या. १० सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपास सुरू होणार आहे.च्त्यानंतर वाहतूककोंडीची समस्या भेडसावणार नसल्याचे काळेयांनी या वेळी सांगितले. कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि वार्डन यांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडते.च् त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाºया वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. अवजड वाहनांमुळेदेखील वाहतूककोंडी होत असल्याने या दिशेने अवजड वाहने न सोडण्याच्या सूचना नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना केल्याचे काळे यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका