शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:51 IST

पत्रीपुलाची फेरबांधणी : पाच मीटरने वाढ, एमएसआरडीसीपुढील अडचणी वाढल्या, गणेशोत्सवानंतर पाडकाम

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांचे सूत जुळता जुळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ८४ मीटर लांबीचा पूल उभारण्यासाठी आराखडा बनविण्याचे नियोजन एमएसआरडीसी करीत होते, पण आता पुन्हा रेल्वेने पुलाची लांबी पाच मीटरने वाढवत तो ८९ मीटरचा हवा, असा नवा फतवा काढला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीची डोकेदुखी वाढली आहे.

एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पुलाची लांबी आणखी पाच मीटरने वाढविण्यासंदर्भात नुकतेच रेल्वेने कळवले. त्यानुसार आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे, पण त्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरात आराखडा बनवून सर्व वरिष्ठांच्या संमतीनंतर तो रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात येण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून मंजुरीसाठी नेमका किती अवधी लागेल हे आता काहीच सांगता येणार नाही.’ रेल्वेने आधी पुलाच्या लांबीसाठी ६०, ७२, ८४ आणि आता ८९ मीटरची अट घातली आहे. प्रत्येक वेळेस रेल्वे पुलाची लांबी वाढवत असल्याने आराखडा बनविण्यापासून सर्वच बाबींमध्ये विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जुन्या पत्रीपुलावर गणेशोत्सवानंतरच हातोडा पडणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा पूल २५ आॅगस्टला पाडायचा होता. त्यासाठी पूर्ण नियोजनही झाले होते, पण आता हे नियोजन पुढे ढकलले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी मात्र बंदच राहील, असा पवित्राही रेल्वे प्रशासनाने घेतल्याने कल्याणमध्ये वाहतूककोंडी कायम आहे.पूल अद्यापही बंदचशिवसेनेने शनिवारी आंदोलन करून जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्या वेळी रेल्वेने पत्रीपूल पादचाºयांसाठी शनिवार, २५ आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, सोमवारपर्यंत तो खुला झालेला नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केली पाहणीच्जुना पत्रीपूल बंद केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सोमवारी दुपारी पत्रीपुलाची पाहणी करून शहरातील एकूणच वाहतूककोंडीचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ उपस्थित होते.च्जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय रेल्वेने २५ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवला आहे. त्या अनुषंगाने अमित काळे यांनी या पुलाची पाहणी करून वाहतूककोंडीचा आढावा घेतला. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक वाहतूक अधिकाºयांना सूचना केल्या. १० सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपास सुरू होणार आहे.च्त्यानंतर वाहतूककोंडीची समस्या भेडसावणार नसल्याचे काळेयांनी या वेळी सांगितले. कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि वार्डन यांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडते.च् त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाºया वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. अवजड वाहनांमुळेदेखील वाहतूककोंडी होत असल्याने या दिशेने अवजड वाहने न सोडण्याच्या सूचना नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना केल्याचे काळे यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका