शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:51 IST

पत्रीपुलाची फेरबांधणी : पाच मीटरने वाढ, एमएसआरडीसीपुढील अडचणी वाढल्या, गणेशोत्सवानंतर पाडकाम

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांचे सूत जुळता जुळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ८४ मीटर लांबीचा पूल उभारण्यासाठी आराखडा बनविण्याचे नियोजन एमएसआरडीसी करीत होते, पण आता पुन्हा रेल्वेने पुलाची लांबी पाच मीटरने वाढवत तो ८९ मीटरचा हवा, असा नवा फतवा काढला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीची डोकेदुखी वाढली आहे.

एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पुलाची लांबी आणखी पाच मीटरने वाढविण्यासंदर्भात नुकतेच रेल्वेने कळवले. त्यानुसार आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे, पण त्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरात आराखडा बनवून सर्व वरिष्ठांच्या संमतीनंतर तो रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात येण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून मंजुरीसाठी नेमका किती अवधी लागेल हे आता काहीच सांगता येणार नाही.’ रेल्वेने आधी पुलाच्या लांबीसाठी ६०, ७२, ८४ आणि आता ८९ मीटरची अट घातली आहे. प्रत्येक वेळेस रेल्वे पुलाची लांबी वाढवत असल्याने आराखडा बनविण्यापासून सर्वच बाबींमध्ये विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जुन्या पत्रीपुलावर गणेशोत्सवानंतरच हातोडा पडणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा पूल २५ आॅगस्टला पाडायचा होता. त्यासाठी पूर्ण नियोजनही झाले होते, पण आता हे नियोजन पुढे ढकलले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी मात्र बंदच राहील, असा पवित्राही रेल्वे प्रशासनाने घेतल्याने कल्याणमध्ये वाहतूककोंडी कायम आहे.पूल अद्यापही बंदचशिवसेनेने शनिवारी आंदोलन करून जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्या वेळी रेल्वेने पत्रीपूल पादचाºयांसाठी शनिवार, २५ आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, सोमवारपर्यंत तो खुला झालेला नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केली पाहणीच्जुना पत्रीपूल बंद केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सोमवारी दुपारी पत्रीपुलाची पाहणी करून शहरातील एकूणच वाहतूककोंडीचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ उपस्थित होते.च्जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय रेल्वेने २५ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवला आहे. त्या अनुषंगाने अमित काळे यांनी या पुलाची पाहणी करून वाहतूककोंडीचा आढावा घेतला. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक वाहतूक अधिकाºयांना सूचना केल्या. १० सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपास सुरू होणार आहे.च्त्यानंतर वाहतूककोंडीची समस्या भेडसावणार नसल्याचे काळेयांनी या वेळी सांगितले. कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि वार्डन यांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडते.च् त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाºया वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. अवजड वाहनांमुळेदेखील वाहतूककोंडी होत असल्याने या दिशेने अवजड वाहने न सोडण्याच्या सूचना नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना केल्याचे काळे यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका