शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: February 23, 2024 18:03 IST

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही.

उल्हासनगर : शहरातील १५० कोटीच्या निधीतील मुख्य ७ रस्त्यांचे बांधकामाबाबत आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक घेऊन येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नेताजी ते भाटीया चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणांचा आड ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्या असून आमदार किणीकर यांनी रस्त्याची पाहणी केली.

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. या रस्त्याच्या पाठोपाठ भुयारी गटारीसाठी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली. याधर्तीवर आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह विभागप्रमुख अधिकाऱ्यांची गुरवारी बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मुख्य ७ रस्त्या पैकी कैलास कॉलनी ते नेताजी चौक दरम्यानच्या नेताजी ते भाटीया चौक मधील ५४ दुकानदारांना रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा दिल्याची माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे. 

महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्यावर त्यांनी राजकीय नेते व महापालिकेकडे धाव घेतली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी बाधित दुकानदारांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्यांच्या आड येणारी बांधकामे हटविणे, धुळीचे प्रदुषण टाकण्यासाठी पाण्याचा वावर करणे, बांधकाम ठिकाणी हिरव्या कपड्याचा वापर करणे, झाडे विद्युत खांब व ट्रांसफार्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करणे, ड्रेनेज व जलवाहिनीची कामे वेळेत पूर्ण करणे, रस्त्यावर खोदकाम करतांना निघालेल्या मातीचे ढिगारे त्वरित हटविणे आदीचे आदेशही काढण्याची मागणी आयुक्तांना आमदार किणीकर यांनी केली. 

आयुक्तांच्या आदेशाची वाट

आमदार बालाजी किणीकर यांनी घेतलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, नगररचनाकार सहायक संचालक ललित खाब्रागडे, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे आदीजन उपस्थित होते. मात्र आमदारांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी साठी आयुक्त कधी आदेश काढतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर