शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: February 23, 2024 18:03 IST

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही.

उल्हासनगर : शहरातील १५० कोटीच्या निधीतील मुख्य ७ रस्त्यांचे बांधकामाबाबत आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक घेऊन येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नेताजी ते भाटीया चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणांचा आड ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्या असून आमदार किणीकर यांनी रस्त्याची पाहणी केली.

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. या रस्त्याच्या पाठोपाठ भुयारी गटारीसाठी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली. याधर्तीवर आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह विभागप्रमुख अधिकाऱ्यांची गुरवारी बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मुख्य ७ रस्त्या पैकी कैलास कॉलनी ते नेताजी चौक दरम्यानच्या नेताजी ते भाटीया चौक मधील ५४ दुकानदारांना रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा दिल्याची माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे. 

महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्यावर त्यांनी राजकीय नेते व महापालिकेकडे धाव घेतली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी बाधित दुकानदारांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्यांच्या आड येणारी बांधकामे हटविणे, धुळीचे प्रदुषण टाकण्यासाठी पाण्याचा वावर करणे, बांधकाम ठिकाणी हिरव्या कपड्याचा वापर करणे, झाडे विद्युत खांब व ट्रांसफार्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करणे, ड्रेनेज व जलवाहिनीची कामे वेळेत पूर्ण करणे, रस्त्यावर खोदकाम करतांना निघालेल्या मातीचे ढिगारे त्वरित हटविणे आदीचे आदेशही काढण्याची मागणी आयुक्तांना आमदार किणीकर यांनी केली. 

आयुक्तांच्या आदेशाची वाट

आमदार बालाजी किणीकर यांनी घेतलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, नगररचनाकार सहायक संचालक ललित खाब्रागडे, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे आदीजन उपस्थित होते. मात्र आमदारांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी साठी आयुक्त कधी आदेश काढतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर