शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: February 23, 2024 18:03 IST

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही.

उल्हासनगर : शहरातील १५० कोटीच्या निधीतील मुख्य ७ रस्त्यांचे बांधकामाबाबत आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक घेऊन येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नेताजी ते भाटीया चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणांचा आड ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्या असून आमदार किणीकर यांनी रस्त्याची पाहणी केली.

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. या रस्त्याच्या पाठोपाठ भुयारी गटारीसाठी रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली. याधर्तीवर आमदार किणीकर यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह विभागप्रमुख अधिकाऱ्यांची गुरवारी बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. तसेच येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मुख्य ७ रस्त्या पैकी कैलास कॉलनी ते नेताजी चौक दरम्यानच्या नेताजी ते भाटीया चौक मधील ५४ दुकानदारांना रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा दिल्याची माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे. 

महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ५४ दुकानदारांना नोटिसा दिल्यावर त्यांनी राजकीय नेते व महापालिकेकडे धाव घेतली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी बाधित दुकानदारांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्यांच्या आड येणारी बांधकामे हटविणे, धुळीचे प्रदुषण टाकण्यासाठी पाण्याचा वावर करणे, बांधकाम ठिकाणी हिरव्या कपड्याचा वापर करणे, झाडे विद्युत खांब व ट्रांसफार्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करणे, ड्रेनेज व जलवाहिनीची कामे वेळेत पूर्ण करणे, रस्त्यावर खोदकाम करतांना निघालेल्या मातीचे ढिगारे त्वरित हटविणे आदीचे आदेशही काढण्याची मागणी आयुक्तांना आमदार किणीकर यांनी केली. 

आयुक्तांच्या आदेशाची वाट

आमदार बालाजी किणीकर यांनी घेतलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, नगररचनाकार सहायक संचालक ललित खाब्रागडे, शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे आदीजन उपस्थित होते. मात्र आमदारांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी साठी आयुक्त कधी आदेश काढतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर