शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भराव केलेल्यांना लाखो रुपये दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:02 IST

भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान!

मीरा रोड : भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान! कारण, बेकायदा मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने विकासक, मालकांना गौण खनिजाच्या लाखो रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. दंड न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर, रात्रीअपरात्री हे भरावमाफिया आमच्या जागेत भराव करतात, असे सांगत काही शेतकऱ्यांनी पालिका, पोलीस व महसूल विभागाने या भरावमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.रस्त्याच्या कडेला, कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्रासह अगदी सरकारी व खाजगी मोकळ्या जागांमध्ये भराव करतात. बहुतांश जमीनमालक, शेतकरी, विकासकही फुकटचा भराव करून मिळत असल्याने तेही आपल्या जागेत भराव करून घेत प्लॉट तयार करून घेतात. शहरात काही भरावमाफिया सक्रिय असून मिळेल तिकडे गाड्या रिकाम्या करतात. २० ते २५ फुटांपर्यंत भराव केले जातात.भराव रोखण्यासाठी पालिकेने पथके नेमली असली, तरी ही पथके काहीच कारवाई करत नाहीत. पोलीसही माफियांना सांभाळण्याचे काम करतात. महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी मनुष्यबळाची कमतरता व अन्य कामांसाठी ठाण्यात असल्याचे कारण पुढे करतात. परंतु, भराव केल्याप्रकरणी आता महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने त्यातील दंडाची रक्कम पाहून सामान्य शेतकºयांचे डोळे पांढरे झाले आहेत.महसूल विभागास गौण खनिजभराव दंडाची रक्कम न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे जमिनीत आपल्या सहमतीशिवाय भराव करणाºया माफियांपासून संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकरी, जमीनमालकांवर आली आहे.नवघर येथील सुहास पाटील म्हणाले की, आमच्या जमिनीत रात्रीअपरात्री माफियांनी भराव केला आहे. आता सरकारने भरावापोटी ७१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. चूक नसताना शेतकºयांनी इतके पैसे भरायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मोर्वा गावातील कुंदन भोईर यांनीही आम्ही भराव केला नसताना दंडाची नोटीस आल्याचे म्हटले आहे. तर, गोडदेव गावातील सचिन घरत म्हणाले की, आमच्या जागेत बळजबरीने भराव केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सतत करूनही कारवाई केली जात नाही.>भरावमाफियांना अद्दल घडवूभरावमाफियांना रोखण्याची जबाबदारी शेतकरी, जमीनमालकाची आहे. पण, रात्री गौण खनिजवाहतुकीला बंदी असताना तसेच दिवसाही अशा वाहनांसह भराव करणाºयांवर पोलीस, पालिका व महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. ते जर कारवाई करणार नसतील, तर भरावमाफियांना शेतकरी अद्दल घडवतील व त्याची जबाबदारी या सर्व यंत्रणांची असेल, असा इशारा आगरी एकता समाजचे प्रशांत म्हात्रे यांनी दिला आहे. जागेवर भराव झालेला आहे, हे सत्य आहे. स्वत:च्या जमिनीचे संरक्षण स्वत:च केले पाहिजे. कारण, भराव हा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला जातो. त्यामुळे दंड हा लागणारच, असे एका अधिकाºयाने सांगितले.