शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

भराव केलेल्यांना लाखो रुपये दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:02 IST

भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान!

मीरा रोड : भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान! कारण, बेकायदा मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने विकासक, मालकांना गौण खनिजाच्या लाखो रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. दंड न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर, रात्रीअपरात्री हे भरावमाफिया आमच्या जागेत भराव करतात, असे सांगत काही शेतकऱ्यांनी पालिका, पोलीस व महसूल विभागाने या भरावमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.रस्त्याच्या कडेला, कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्रासह अगदी सरकारी व खाजगी मोकळ्या जागांमध्ये भराव करतात. बहुतांश जमीनमालक, शेतकरी, विकासकही फुकटचा भराव करून मिळत असल्याने तेही आपल्या जागेत भराव करून घेत प्लॉट तयार करून घेतात. शहरात काही भरावमाफिया सक्रिय असून मिळेल तिकडे गाड्या रिकाम्या करतात. २० ते २५ फुटांपर्यंत भराव केले जातात.भराव रोखण्यासाठी पालिकेने पथके नेमली असली, तरी ही पथके काहीच कारवाई करत नाहीत. पोलीसही माफियांना सांभाळण्याचे काम करतात. महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी मनुष्यबळाची कमतरता व अन्य कामांसाठी ठाण्यात असल्याचे कारण पुढे करतात. परंतु, भराव केल्याप्रकरणी आता महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने त्यातील दंडाची रक्कम पाहून सामान्य शेतकºयांचे डोळे पांढरे झाले आहेत.महसूल विभागास गौण खनिजभराव दंडाची रक्कम न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे जमिनीत आपल्या सहमतीशिवाय भराव करणाºया माफियांपासून संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकरी, जमीनमालकांवर आली आहे.नवघर येथील सुहास पाटील म्हणाले की, आमच्या जमिनीत रात्रीअपरात्री माफियांनी भराव केला आहे. आता सरकारने भरावापोटी ७१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. चूक नसताना शेतकºयांनी इतके पैसे भरायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मोर्वा गावातील कुंदन भोईर यांनीही आम्ही भराव केला नसताना दंडाची नोटीस आल्याचे म्हटले आहे. तर, गोडदेव गावातील सचिन घरत म्हणाले की, आमच्या जागेत बळजबरीने भराव केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सतत करूनही कारवाई केली जात नाही.>भरावमाफियांना अद्दल घडवूभरावमाफियांना रोखण्याची जबाबदारी शेतकरी, जमीनमालकाची आहे. पण, रात्री गौण खनिजवाहतुकीला बंदी असताना तसेच दिवसाही अशा वाहनांसह भराव करणाºयांवर पोलीस, पालिका व महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. ते जर कारवाई करणार नसतील, तर भरावमाफियांना शेतकरी अद्दल घडवतील व त्याची जबाबदारी या सर्व यंत्रणांची असेल, असा इशारा आगरी एकता समाजचे प्रशांत म्हात्रे यांनी दिला आहे. जागेवर भराव झालेला आहे, हे सत्य आहे. स्वत:च्या जमिनीचे संरक्षण स्वत:च केले पाहिजे. कारण, भराव हा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला जातो. त्यामुळे दंड हा लागणारच, असे एका अधिकाºयाने सांगितले.