शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

उल्हासनगरात रेल्वेच्या विजेच्या लाईन खालील बांधकामांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: October 14, 2022 15:56 IST

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या समांतर गेलेली रेल्वेची उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली अवैध बांधकामे झाल्याने, अपघाताची शक्यता निर्माण झाली. रेल्वे याबाबत महापालिकेला पत्र दिल्यावर अशा बांधकामाना अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी नोटिसा देऊन बांधकामे काढून घेण्यास बजावले आहे.

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले. त्यापैकी २०० बांधकामे पूर्णतः बाधित झाले असून त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे. तर अंशतः बाधित झालेल्या दुकानदारांनी बहुमजली बांधकामे केली. रस्त्याच्या समांतर रेल्वेची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून रुंदीकरणाच्या नावाखाली विधुत वाहिनी गेली, त्याखाली उंच बांधकामे केली. या बांधकामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त करून बांधकामाबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला कारवाईचे पत्र पाठविले. महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशनुसार नोटसा देऊन बांधकामे स्वतःहून काढण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या नोटीसीने दुकानदारांत खळबळ उडाली आहे. 

रस्ता रुंदीकरणात दुकानाची जागा गेली असून पुन्हा महापालिकेने नोटिसा पाठविल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. बांधकामे व विद्युत वाहिनी यामध्ये अंतर असून अपघात होण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आतापर्यंत १० दुकानदारांना बांधकामे स्वतःहून काढण्याच्या नोटिसा दिल्या असून रेल्वे विद्युत वाहिनी खालील सर्वच दुकानदारांना नोटिसा देणार असल्याचे संकेत दिले. रुंदीकरणात ज्यांचे दुकाने बाधित झाली. त्यांनी बहुमजली बांधकामे कोणतीही बांधकाम परवाने न घेता बांधण्यात आले. या बांधकामाला अवैध असल्याचे ठरवून दुप्पट मालमत्ता कर बिले देण्यात आले असे दुकानदारांचे म्हणणे आहे. नोटिसा दिलेल्या दुकानदारांनी स्वतःहून बांधकामे काढली नाहीतर, त्यावर पाडकाम कारवाईचा इशारा शिंपी यांनी दिला आहे. 

शांतीप्रकाश शाळा रस्ता रुंदीकरणाची बांधकामाची चर्चा कॅम्प नं-५ वसंतबहार शांतीप्रकाश शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बहुमजली विना बांधकामे उभी राहिली असून महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर