शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरात रेल्वेच्या विजेच्या लाईन खालील बांधकामांना नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: October 14, 2022 15:56 IST

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या समांतर गेलेली रेल्वेची उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली अवैध बांधकामे झाल्याने, अपघाताची शक्यता निर्माण झाली. रेल्वे याबाबत महापालिकेला पत्र दिल्यावर अशा बांधकामाना अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी नोटिसा देऊन बांधकामे काढून घेण्यास बजावले आहे.

उल्हासनगरातून गेलेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले असून ९०० पेक्षा जास्त दुकाने बाधित झाले. त्यापैकी २०० बांधकामे पूर्णतः बाधित झाले असून त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे. तर अंशतः बाधित झालेल्या दुकानदारांनी बहुमजली बांधकामे केली. रस्त्याच्या समांतर रेल्वेची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून रुंदीकरणाच्या नावाखाली विधुत वाहिनी गेली, त्याखाली उंच बांधकामे केली. या बांधकामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त करून बांधकामाबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला कारवाईचे पत्र पाठविले. महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशनुसार नोटसा देऊन बांधकामे स्वतःहून काढण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या नोटीसीने दुकानदारांत खळबळ उडाली आहे. 

रस्ता रुंदीकरणात दुकानाची जागा गेली असून पुन्हा महापालिकेने नोटिसा पाठविल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे. बांधकामे व विद्युत वाहिनी यामध्ये अंतर असून अपघात होण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आतापर्यंत १० दुकानदारांना बांधकामे स्वतःहून काढण्याच्या नोटिसा दिल्या असून रेल्वे विद्युत वाहिनी खालील सर्वच दुकानदारांना नोटिसा देणार असल्याचे संकेत दिले. रुंदीकरणात ज्यांचे दुकाने बाधित झाली. त्यांनी बहुमजली बांधकामे कोणतीही बांधकाम परवाने न घेता बांधण्यात आले. या बांधकामाला अवैध असल्याचे ठरवून दुप्पट मालमत्ता कर बिले देण्यात आले असे दुकानदारांचे म्हणणे आहे. नोटिसा दिलेल्या दुकानदारांनी स्वतःहून बांधकामे काढली नाहीतर, त्यावर पाडकाम कारवाईचा इशारा शिंपी यांनी दिला आहे. 

शांतीप्रकाश शाळा रस्ता रुंदीकरणाची बांधकामाची चर्चा कॅम्प नं-५ वसंतबहार शांतीप्रकाश शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बहुमजली विना बांधकामे उभी राहिली असून महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर