शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

१५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:20 IST

मीरा-भाईंदरमध्ये सर्वेक्षण : विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, जुन्या इमारती, गाळ््यात वर्ग

मीरा रोड : मीरा भार्इंदरमधील खाजगी शिकवण्यांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ मे रोजी दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील खाजगी शिकवण्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गुरुवारपर्यंत १५० खाजगी शिकवणे वर्ग आढळले. त्यांना सुरक्षिततेच्या उपायोजनांबाबत नोटिसा बजावण्यास शुक्रवारपासून अग्निशमन दलाने सुरूवात केली आहे. तर आणखी शिकवण्यांचा शोध घेणेही सुरू आहे.

सूरत येथील खाजगी शिकवणीमध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मीरा भार्इंदरमधील खाजगी शिकवण्यांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षाही वाºयावर असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते.खाजगी शिकवणी चालकांच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३५० लहान - मोठया शिकवण्या चालतात. गलेलठ्ठ फी वसूल करणाºया चालकांनी शिकवण्या मात्र जुन्या इमारती, गाळे, सदनिकांमध्ये घेतात. बहुतांश शिकवण्या दाटीवाटीच्या जागेत असून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था देखील खुराड्यासारखी आहे. बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग व तेही अडचणीचे व अरूंद आहेत. हवा व उजेड येण्यास जागा सोडली जात नाही. त्यातच अग्निशमन यंत्रणा चालकांकडून लावली जात नाही. पालिकेने खाजगी शिकवण्यांचे सर्वेक्षण सुरु केले असून विद्यार्थी संख्येनुसार शिकवण्यांची वर्गवारी केली आहे. गुरुवारी १३ जूनपर्यंत १५० खाजगी शिकवण्या आढळल्या. त्यातील १२४ शिकवण्यांची वर्गवारी केली असून २० ते २५ विद्यार्थी संख्या असलेल्या २०, २६ ते ५० विद्यार्थी संख्या असलेल्या ३२, ५१ ते ७५ विद्यार्थी संख्या असलेल्या १८, ७६ ते १०० विद्यार्थी असलेल्या ५ व शंभर पेक्षा जास्त संख्या असलेल्या शिकवण्यांची संख्या ४८ इतकी आहे. अजूनही सर्वेक्षण सुरु असून शिकवण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आढळलेल्या १५० शिकवणी चालकांना नोटिसा देण्यास सुरूवात केली आहे. शाळांच्या निकषानुसारच शिकवणी चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपायोजना करण्यास सांगितल्या जाणार आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षण उपाययोजना अधिनियम २००६ मधील कलम ६ व नियम ९(१) नुसार कार्यवाही करणार असल्याचे प्रभारी अग्निशमन दलप्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले.शिकवणीच्या जागेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची आसनक्षमता निश्चित केली जाणार आहे. पोटमाळ्यांमधील शिकवण्या बंद करायला सांगणार आहोत. अग्निशमन यंत्रणा बसवणे सक्तीचे करू, पुरेशा खिडक्या, अतिरिक्त दरवाजा याची खात्री केली जाईल. धोकादायक अवस्थेतील वा बांधकामातील शिकवण्या बंद करण्यास सांगणार आहोत. विद्यार्थ्यांना आपत्कालीन स्थितीत घेण्याची खबरादारी या बद्दल अग्निशमन दलातर्फे प्रशिक्षण देणार आहोत असे बोराडे म्हणाले.१२ शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाहीमीरा भार्इंदरमधील ७६ शाळांना अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पत्रव्यव्हार, नोटिसा बजावल्या आहेत. यातील ६४ शाळांनी अग्निशमन यंत्रणा बसवली आहे. पण १२ शाळांनी अजूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षे कडे कानाडोळा चालवला आहे. शिक्षण विभागाकडूनही या शाळांना अनुदान बंद करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या बाबत शिक्षण संचालकांसह आयुक्त आदींची बैठक घेऊन कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जणार आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे