शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध

ठाणे : रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध आणखीनच पेटले आहे. आपण ठाणेकरांचे नोकरदार आहोत, हे आयुक्त विसरले असून, ते हुकमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी केला. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी, असे ठणकावत यापुढे जर अपमान केला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन, असा इशाराही त्यांनी दिला.मंगळवारी महासभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांच्या तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करून बुधवारी पुन्हा बोलावली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी तिला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ती काही काळासाठी तहकूब केली. एकीकडे महासभा सुरू असतानाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाºयांची बैठक बोलावली. मार्चअखेरच्या कामांमध्ये अधिकारी व्यस्त असून, काही विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत, अशी सबब प्रशासनाने दिली. त्यामुळे आता महासभा केव्हा बोलवायची हे मी ठरविणार असल्याचे महापौरांनी प्रशासनाला सुनावले.आता तर त्यापुढे जाऊन महापौरांनी आयुक्तांवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला. जे सरकारी नोकर आहेत, ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरासमोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा, असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले.नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपस्थित राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत. मात्र, वर्तणूक सुधारली नाही, तर ते मी वापरू शकते. सभागृहात हक्कभंगही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उद्ध्वस्त करून शहर स्मार्ट कशी होणार? असे प्रश्न करून महापौरांनी आयुक्तावर तोफ डागली. ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्ध्वस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते, अशी चिथावणीखोर भूमिका महापौरांनी घेतली.