शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध

ठाणे : रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध आणखीनच पेटले आहे. आपण ठाणेकरांचे नोकरदार आहोत, हे आयुक्त विसरले असून, ते हुकमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी केला. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी, असे ठणकावत यापुढे जर अपमान केला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन, असा इशाराही त्यांनी दिला.मंगळवारी महासभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांच्या तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करून बुधवारी पुन्हा बोलावली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी तिला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ती काही काळासाठी तहकूब केली. एकीकडे महासभा सुरू असतानाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाºयांची बैठक बोलावली. मार्चअखेरच्या कामांमध्ये अधिकारी व्यस्त असून, काही विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत, अशी सबब प्रशासनाने दिली. त्यामुळे आता महासभा केव्हा बोलवायची हे मी ठरविणार असल्याचे महापौरांनी प्रशासनाला सुनावले.आता तर त्यापुढे जाऊन महापौरांनी आयुक्तांवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला. जे सरकारी नोकर आहेत, ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरासमोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा, असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले.नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपस्थित राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत. मात्र, वर्तणूक सुधारली नाही, तर ते मी वापरू शकते. सभागृहात हक्कभंगही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उद्ध्वस्त करून शहर स्मार्ट कशी होणार? असे प्रश्न करून महापौरांनी आयुक्तावर तोफ डागली. ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्ध्वस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते, अशी चिथावणीखोर भूमिका महापौरांनी घेतली.