शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:10 IST

आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

ठाणे : आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.समता विचार प्रसारक संस्था व कोपरी संघर्ष समिती आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेमध्ये बोलताना वारे म्हणाले की, संविधानाने भारतातील सर्व जातीधर्मांच्या स्त्रीपुरुषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपले संविधान एक थेंबही रक्त न सांडता झालेली क्रांती आहे. कारण, आपल्या संविधानाने २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रियांनासुद्धा किती वर्षे लढा द्यावा लागला होता. संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरेच काही आहे. शेतकºयांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधानाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे, म्हणून गरीब खूश आहेत आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून श्रीमंत खूश आहेत. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता, पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण, असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही. ती हमी फक्त नागरिकांची सामूहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून, संविधान अभ्यासून, समजून घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही, तर घरासाठीही संविधान लागू आहे, असे मत त्यांनी मांडले.  अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. संस्थेचे सहखजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना, तर समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे