शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:10 IST

आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

ठाणे : आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.समता विचार प्रसारक संस्था व कोपरी संघर्ष समिती आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेमध्ये बोलताना वारे म्हणाले की, संविधानाने भारतातील सर्व जातीधर्मांच्या स्त्रीपुरुषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपले संविधान एक थेंबही रक्त न सांडता झालेली क्रांती आहे. कारण, आपल्या संविधानाने २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रियांनासुद्धा किती वर्षे लढा द्यावा लागला होता. संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरेच काही आहे. शेतकºयांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधानाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे, म्हणून गरीब खूश आहेत आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून श्रीमंत खूश आहेत. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता, पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण, असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही. ती हमी फक्त नागरिकांची सामूहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून, संविधान अभ्यासून, समजून घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही, तर घरासाठीही संविधान लागू आहे, असे मत त्यांनी मांडले.  अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. संस्थेचे सहखजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना, तर समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे