शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 3:58 AM

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे.

किन्हवली - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. या तडकलेल्या भातशेतीमुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतावर अनेक रोग पडले आणि १५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भातजमिनी तडकल्या. परिणामी, भातपिके कोमेजली.येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र भातशेतीच्या उत्पन्नावर मोठी आफत येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाअभावी शेतीची अशीच स्थिती राहिली, तर यावेळी भातपिके जळून जाण्याची स्थिती आहे. या परिस्थितीत शेतीला पावसाची आवश्यकता असून आता भाताच्या आत दाणा तयार होत असताना पाण्याची नितांत गरज आहे. सोसायटीचे कर्ज काढून शेतकºयांनी शेती लावली असून विकत बियाणे आणि खते मारून तयार केलेल्या भातशेतीवर पावसाने दडी मारल्याने करप्या, बगळ्या हे रोग पडतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पावसाअभावीभात शेती तडकलीभातसानगर : शहापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जोमाने वाढलेली भात पीके उन्हाने तडकल्याने शेतकरी धास्तावला आहे.या तडकलेल्या भात शेतीमुळे आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर येवून ठेपला आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी आशा असताना गेले काही दिवसापासून शेतावर अनेक रोग पडलेले असतानांच आता गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भात जमीनी तडकल्याने भात पीके कोमेजुन जावू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.आता शेतकºयांचे लक्ष पावसाकडे असून पाऊस कधी पडतो अशी चिंता त्यांना लागली आहे. कारण सध्याच्या परिस्थिति शेतीला पावसाची आवश्यकता आहे.सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी भातशेतीची कामे वेळीच केली. चालू वर्षी पीक चांगले येईल, या आशेवर असतानाच पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास शेतकºयांच्या तोंडून निघून जाणार आहे.- मल्हारी चंदे, शेतकरी / शेतकरी मार्गदर्शककिन्हवली परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे व आता भातपीक पोटरीवर आहेत. पावसाने दडी मारल्यावर पिकांचे नुकसान होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

टॅग्स :Farmerशेतकरीshahapurशहापूर