शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

काम नाही अन् राहायला घर नाही, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:44 IST

  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले.

- मनोहर पाटोळे  आसनगाव -  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले. मात्र, त्यानंतर महाराष्टÑ शासनाच्या तसेच आदिवासी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रणरागिणीला सध्या स्थलांतरिताचे जीवन जगावे लागते आहे. ठोस रोजगार नाही अन् राहायला घर नाही, अशीच तिची सध्या परवड सुरू आहे.मूळची तानसा अभयारण्याच्या क्षेत्रातील नांदगाव येथील रहिवासी असलेली हाली ही सध्या रातांधळे येथील आदिवासी वस्तीत मोडक्यातोडक्या झोपडीत राहते आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या शहापूर प्रकल्पाने या बालशौर्य विजेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आदिवासी विकास विभाग तसेच ठाणे जिल्हा परिषदेकडे घरकुलाच्या असंख्य योजना असून त्यातील एकाही योजनेतून हाली बरफ हिला घरकुल दिलेले नाही. धक्कादायक म्हणजे महसूल खात्याने तिला साधी शिधापत्रिकादेखील अद्याप दिलेली नाही. स्थानिक ग्रामपंचायतीनेदेखील तिच्या राष्ट्रीयस्तरावरील या शौर्य पुरस्काराची हवी तशी दखलच घेतलेली नाही. पती आणि दोन मुलांसह हाली सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगते आहे. वेळप्रसंगी या शौर्यविजेतीला वीटभट्टीवर मजुरीदेखील करावी लागते आहे. इतकेच नव्हे तर उपासमारीलाही सामोरे जावे लागते आहे. शासन योजनांपासून दुर्लक्षित राहिलेल्या धाडसी हालीच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या झोपी गेलेल्या आदिवासी विकास खात्याला आणि अन्य प्राधिकरणाला कधी जाग येईल, हा मुख्य प्रश्न आहे.चौथीच्या पुस्तकात धडा : शौर्यविजेत्या शहापूरच्या हाली बरफचा आदर्श शालेय वयातच राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरला जावा, म्हणून इयत्ता चौथीच्या अभ्यासात ‘धाडसी हाली’, हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षण खात्याच्या बालभारतीच्या पाठातील धाडसी हालीच्या आयुष्याची प्रत्यक्षात मात्र अठराविश्वे दारिद्र्याने परवड केली आहे.राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्हास प्राप्त झाल्यास सकारात्मक विचार होऊन वरिष्ठ पातळीवरून ते तत्काळ मंजूर होऊन त्यांना देण्यात येईल.- अरुणकुमार जाधव, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीपुरस्कार मिळाल्यानंतर सुरुवातीला सर्वांनी दखल घेतली. बरोरासाहेबांनी आमचा सन्मान केला. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. रेशनिंगकार्ड नसल्याने धान्य मिळत नाही. मी आणि माझा नवरा मोलमजुरी करून कुटुंब चालवतो. - हाली बरफ,राष्ट्रीय पुरस्कार विजेती

टॅग्स :newsबातम्याthaneठाणे