शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वसई-विरारकरांना यंदा ‘नो टेन्शन’ ! सूर्या-धामणीत 62.32 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:43 IST

उसगाव, पेल्हारमध्ये मात्र ३ महिन्यांचा साठा : काटेकोर नियोजन करावे लागणार

आशीष राणे

वसई : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच खालावला असून जेमेतेम ३ महिने पुरेल इतकाच साठा त्यात शिल्लक आहे. तर पालघरमधील सूर्या-धामणी धरणातील साठा मुबलक असल्याने तो बहुतांश वर्षभर पुरेल असे आकडेवारीवरून दिसते. सूर्याधामणी  धरणात ६३.३२ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता मार्चचा पहिला आठवडा संपत आला आणि कडक उन्हे असून धरण क्षेत्रांत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर हळूहळू होत आहे. उसगाव व पेल्हारमध्ये जेमतेम ९० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. मार्च, एप्रिल व मे महिने मुळात पाणीकपातीचे. त्यात येथील धरणात पाणीसाठा कमी आहे. मात्र सूर्या-धामणीतील पाण्याचा विचार करून कपात होणार की नाही? हे पाणीपुरवठा विभागाने जरी स्पष्ट केले नसले तरीही पालिकेला धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करावे लागणार हे नक्की.

पथक फिरते करण्याची मागणीमहापालिकेने धरणातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, अन्यथा हजारो लाखों लीटर पाणी वाया जाईल. महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे, अशी मागणी काही नागरिक करत आहेत. 

४ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाणीसाठा

पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६.३५ घनमीटर दशलक्ष लिटर म्हणजे ६३.३२ टक्के साठा आहे. वसईच्या उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष म्हणजे ५८.६७ टक्के साठा आहे. तर पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर इतका अर्थात ५०.९३ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी