शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारकरांना यंदा ‘नो टेन्शन’ ! सूर्या-धामणीत 62.32 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:43 IST

उसगाव, पेल्हारमध्ये मात्र ३ महिन्यांचा साठा : काटेकोर नियोजन करावे लागणार

आशीष राणे

वसई : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच खालावला असून जेमेतेम ३ महिने पुरेल इतकाच साठा त्यात शिल्लक आहे. तर पालघरमधील सूर्या-धामणी धरणातील साठा मुबलक असल्याने तो बहुतांश वर्षभर पुरेल असे आकडेवारीवरून दिसते. सूर्याधामणी  धरणात ६३.३२ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता मार्चचा पहिला आठवडा संपत आला आणि कडक उन्हे असून धरण क्षेत्रांत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर हळूहळू होत आहे. उसगाव व पेल्हारमध्ये जेमतेम ९० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. मार्च, एप्रिल व मे महिने मुळात पाणीकपातीचे. त्यात येथील धरणात पाणीसाठा कमी आहे. मात्र सूर्या-धामणीतील पाण्याचा विचार करून कपात होणार की नाही? हे पाणीपुरवठा विभागाने जरी स्पष्ट केले नसले तरीही पालिकेला धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करावे लागणार हे नक्की.

पथक फिरते करण्याची मागणीमहापालिकेने धरणातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, अन्यथा हजारो लाखों लीटर पाणी वाया जाईल. महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे, अशी मागणी काही नागरिक करत आहेत. 

४ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाणीसाठा

पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६.३५ घनमीटर दशलक्ष लिटर म्हणजे ६३.३२ टक्के साठा आहे. वसईच्या उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष म्हणजे ५८.६७ टक्के साठा आहे. तर पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर इतका अर्थात ५०.९३ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी