शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

वसई-विरारकरांना यंदा ‘नो टेन्शन’ ! सूर्या-धामणीत 62.32 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:43 IST

उसगाव, पेल्हारमध्ये मात्र ३ महिन्यांचा साठा : काटेकोर नियोजन करावे लागणार

आशीष राणे

वसई : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच खालावला असून जेमेतेम ३ महिने पुरेल इतकाच साठा त्यात शिल्लक आहे. तर पालघरमधील सूर्या-धामणी धरणातील साठा मुबलक असल्याने तो बहुतांश वर्षभर पुरेल असे आकडेवारीवरून दिसते. सूर्याधामणी  धरणात ६३.३२ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता मार्चचा पहिला आठवडा संपत आला आणि कडक उन्हे असून धरण क्षेत्रांत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर हळूहळू होत आहे. उसगाव व पेल्हारमध्ये जेमतेम ९० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. मार्च, एप्रिल व मे महिने मुळात पाणीकपातीचे. त्यात येथील धरणात पाणीसाठा कमी आहे. मात्र सूर्या-धामणीतील पाण्याचा विचार करून कपात होणार की नाही? हे पाणीपुरवठा विभागाने जरी स्पष्ट केले नसले तरीही पालिकेला धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करावे लागणार हे नक्की.

पथक फिरते करण्याची मागणीमहापालिकेने धरणातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, अन्यथा हजारो लाखों लीटर पाणी वाया जाईल. महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे, अशी मागणी काही नागरिक करत आहेत. 

४ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाणीसाठा

पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६.३५ घनमीटर दशलक्ष लिटर म्हणजे ६३.३२ टक्के साठा आहे. वसईच्या उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष म्हणजे ५८.६७ टक्के साठा आहे. तर पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर इतका अर्थात ५०.९३ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी