शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

स्थगिती नसल्याने घरे लवकर द्या, फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:31 IST

भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे परिसरासह भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे. या योजनेला सरकारने स्थगिती दिली नसल्याचा टोला मारत, या प्रस्तावांवर सरकारने लवकर निर्णय घेतल्यास, या घरांचा लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दी ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. यासाठी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी क्लस्टर योजनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख घरांचे प्रस्ताव आले. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील प्रकल्पासह वसई-विरार परिसरातील अनेक प्रकल्पांवर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.>वरच्या मजल्याची आशा नाही : नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे, असे प्रकार सुरू असल्याचा मुद्दा खा. सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठला मजला कोणी घेतला, याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल, याची आशा मला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनतेचे वकील म्हणून त्यांच्या समस्या ताकदीने सरकारपुढे मांडून त्यांचे निराकरण करू, असे त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले.>महाविकास आघाडीवर सहस्रबुद्धेंनी केली टीकासत्तास्थापनेसाठी झालेल्या नवीन राजकीय समीकरणांचा संदर्भ गृह प्रकल्पांशी जोडत, सहस्रबुद्धे आडवळणाने म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील इमारतीत दुसराच कुणीतरी घुसतो. ती इमारत बळकावतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवले जात आहे. म्हणूनच, अवघ्या तीनचार महिन्यांत या भुसभुशीत जमिनीवरील इमारत खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मूळ मालकाला ती मिळावी. तसा संपूर्ण पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून, त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ट्रक वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस