शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

स्थगिती नसल्याने घरे लवकर द्या, फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:31 IST

भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे परिसरासह भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे. या योजनेला सरकारने स्थगिती दिली नसल्याचा टोला मारत, या प्रस्तावांवर सरकारने लवकर निर्णय घेतल्यास, या घरांचा लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दी ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. यासाठी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी क्लस्टर योजनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख घरांचे प्रस्ताव आले. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील प्रकल्पासह वसई-विरार परिसरातील अनेक प्रकल्पांवर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.>वरच्या मजल्याची आशा नाही : नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे, असे प्रकार सुरू असल्याचा मुद्दा खा. सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठला मजला कोणी घेतला, याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल, याची आशा मला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनतेचे वकील म्हणून त्यांच्या समस्या ताकदीने सरकारपुढे मांडून त्यांचे निराकरण करू, असे त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले.>महाविकास आघाडीवर सहस्रबुद्धेंनी केली टीकासत्तास्थापनेसाठी झालेल्या नवीन राजकीय समीकरणांचा संदर्भ गृह प्रकल्पांशी जोडत, सहस्रबुद्धे आडवळणाने म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील इमारतीत दुसराच कुणीतरी घुसतो. ती इमारत बळकावतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवले जात आहे. म्हणूनच, अवघ्या तीनचार महिन्यांत या भुसभुशीत जमिनीवरील इमारत खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मूळ मालकाला ती मिळावी. तसा संपूर्ण पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून, त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ट्रक वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस