शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

स्थगिती नसल्याने घरे लवकर द्या, फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:31 IST

भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे परिसरासह भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे. या योजनेला सरकारने स्थगिती दिली नसल्याचा टोला मारत, या प्रस्तावांवर सरकारने लवकर निर्णय घेतल्यास, या घरांचा लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दी ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. यासाठी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी क्लस्टर योजनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख घरांचे प्रस्ताव आले. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील प्रकल्पासह वसई-विरार परिसरातील अनेक प्रकल्पांवर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.>वरच्या मजल्याची आशा नाही : नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे, असे प्रकार सुरू असल्याचा मुद्दा खा. सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठला मजला कोणी घेतला, याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल, याची आशा मला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनतेचे वकील म्हणून त्यांच्या समस्या ताकदीने सरकारपुढे मांडून त्यांचे निराकरण करू, असे त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले.>महाविकास आघाडीवर सहस्रबुद्धेंनी केली टीकासत्तास्थापनेसाठी झालेल्या नवीन राजकीय समीकरणांचा संदर्भ गृह प्रकल्पांशी जोडत, सहस्रबुद्धे आडवळणाने म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील इमारतीत दुसराच कुणीतरी घुसतो. ती इमारत बळकावतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवले जात आहे. म्हणूनच, अवघ्या तीनचार महिन्यांत या भुसभुशीत जमिनीवरील इमारत खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मूळ मालकाला ती मिळावी. तसा संपूर्ण पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून, त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ट्रक वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस