शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

स्थगिती नसल्याने घरे लवकर द्या, फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:31 IST

भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे परिसरासह भिवंडी रोडवर एक लाख घरांचा प्रकल्प असून, वसई-विरार परिसरांतील अनेक प्रकल्पांद्वारे सामान्य माणसाला घर मिळणे शक्य आहे. या योजनेला सरकारने स्थगिती दिली नसल्याचा टोला मारत, या प्रस्तावांवर सरकारने लवकर निर्णय घेतल्यास, या घरांचा लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दी ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. यासाठी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी क्लस्टर योजनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख घरांचे प्रस्ताव आले. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील प्रकल्पासह वसई-विरार परिसरातील अनेक प्रकल्पांवर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.>वरच्या मजल्याची आशा नाही : नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे, असे प्रकार सुरू असल्याचा मुद्दा खा. सहस्रबुद्धे यांनी मांडला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठला मजला कोणी घेतला, याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल, याची आशा मला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनतेचे वकील म्हणून त्यांच्या समस्या ताकदीने सरकारपुढे मांडून त्यांचे निराकरण करू, असे त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले.>महाविकास आघाडीवर सहस्रबुद्धेंनी केली टीकासत्तास्थापनेसाठी झालेल्या नवीन राजकीय समीकरणांचा संदर्भ गृह प्रकल्पांशी जोडत, सहस्रबुद्धे आडवळणाने म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील इमारतीत दुसराच कुणीतरी घुसतो. ती इमारत बळकावतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवले जात आहे. म्हणूनच, अवघ्या तीनचार महिन्यांत या भुसभुशीत जमिनीवरील इमारत खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मूळ मालकाला ती मिळावी. तसा संपूर्ण पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून, त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ट्रक वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस